राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये आज स्वच्छता मोहीम

‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार


स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता होणार


मुंबई : नगरविकास विभागाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२५’ सुरू असून याअंतर्गत राज्यातील अस्वच्छ असलेल्या सुमारे २० हजार ४४६ ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत २५ सप्टेंबर रोजी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये ‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.


राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता करून त्या ठिकाणांचे परिवर्तन करणे, सार्वजनिक जागांची स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबिर, स्वच्छ हरित महोत्सव आणि स्वच्छता पुरस्कार या उपक्रमांचा समावेश आहे.


या अभियानाअंतर्गत गुरुवारी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये ‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाअंतर्गत सकाळी ८.०० वा. लोकांच्या सहभागाने सामूहिक स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेट्रो सिनेमा ते ईएनटी रुग्णालय मार्गावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत.


‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात राज्यातील २०,४४६ ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून आजपर्यंत त्यातील सुमारे ६,०८२ ठिकाणे स्वच्छ करण्यात आली आहेत. स्वच्छता अभियानात जनसहभागाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सफाई मित्रांसाठी ४०६ सुरक्षा शिबिरे घेण्यात येणार आहेत. तसेच २,१७३ ठिकाणी स्वच्छ हरित महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२