राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये आज स्वच्छता मोहीम

‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार


स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता होणार


मुंबई : नगरविकास विभागाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२५’ सुरू असून याअंतर्गत राज्यातील अस्वच्छ असलेल्या सुमारे २० हजार ४४६ ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत २५ सप्टेंबर रोजी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये ‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.


राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता करून त्या ठिकाणांचे परिवर्तन करणे, सार्वजनिक जागांची स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबिर, स्वच्छ हरित महोत्सव आणि स्वच्छता पुरस्कार या उपक्रमांचा समावेश आहे.


या अभियानाअंतर्गत गुरुवारी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये ‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाअंतर्गत सकाळी ८.०० वा. लोकांच्या सहभागाने सामूहिक स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेट्रो सिनेमा ते ईएनटी रुग्णालय मार्गावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत.


‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात राज्यातील २०,४४६ ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून आजपर्यंत त्यातील सुमारे ६,०८२ ठिकाणे स्वच्छ करण्यात आली आहेत. स्वच्छता अभियानात जनसहभागाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सफाई मित्रांसाठी ४०६ सुरक्षा शिबिरे घेण्यात येणार आहेत. तसेच २,१७३ ठिकाणी स्वच्छ हरित महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,