सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद; वाहनांच्या रांगा

पुणे : राज्यातील काही भागात पावसानं थैमान घातलंय. दुष्काळी गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानं गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत अभूतपूर्व अशी वाढ झाल्यानं अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच पूर आलाय. नदीचं पाणी लांबोटी इथं सोलापूर-पुणे महामार्गावर आलं आहे. यामुळे सोलापूर पुणे महामार्ग रात्री ११ वाजल्यापासून बंद करण्यात आलाय. परिणामी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या पुलावरून वाहतूक बंद केली आहे. सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकसुद्धा बंद केल्याची माहिती समोर येत आहे. सीना नदीचं पाणी ओसरेपर्यंत ही वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. वाहतूक बंद असल्यानं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय.

सीना नदीच्या पुरामुळे रेल्वे वाहतुकीलासुद्धा फटका बसला आहे. सोलापूर विभागातील रेल्वे गाड्यांचा वेग सीना नदीवरील पुलावर ३० किमी प्रतितास इतका कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर करमाळा तालुक्यात मुंडेवाडी इथं पाणी रेल्वे पुलाजवळ पोहोचलंय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अतिवृष्टीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. सकाळी ते मुंबईतून सोलापूरला जाणार आहेत. माढा तालुक्यातील निमगाव, दारफळ या गावांसह भागातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यानंतर लातूरला उजनी, औसा, नणंद, औराद शहाजनी या भागात दौरा करणार आहे

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन