‘ए आय’च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल

निती आयोग करणार सिंधुदुर्गातील ‘ए आय’ प्रकल्पाचा अभ्यास - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे


मुंबई : ‘ए आय’ तंत्रज्ञानाने प्रशासन व सुरक्षा व्यवस्था हाताळणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. १ मे २०२५ रोजी पासून जिल्ह्यातील ८ विभागांचे कामकाज कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून सुरू असून याचा अभ्यास करण्यासाठी पुढील महिन्यात निती आयोगाचे पथक येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. मंत्रालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे बोलत होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा देशात पहिला ‘ए आय’ युक्त जिल्हा झाल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, यामुळे ग्रामीण जिल्हा अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. ‘ए आय’च्या माध्यमातून नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटक यांची सुरक्षितता निश्चित झाली आहे. तसेच महामार्गावरील अपघात रोखणे, त्याचा तपास करणे, जिल्ह्यातील हत्तींचा प्रश्न मार्गी लावणे शक्य झाले आहे. अनेक प्रलंबित प्रकरणे यामुळे मार्गी लावली जात आहेत. जिल्ह्यातील समस्यांवर उत्तरे शोधली जात असल्याचे राणे यांनी सांगितले.


मंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘ए आय’ मॉडेल याचा अभ्यास आता निती आयोग करणार आहे. हे मॉडेल देशपातळीवर राबवण्याविषयीही निती आयोग अभ्यास करणार आहे. जिल्ह्यातील नगर विकास, परिवहन पोलीस विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अशा महत्वाच्या विभागांमध्ये सध्या ‘एआय’ तंत्रज्ञान आधारित यंत्रणा सक्रिय आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांनाही हे मॉडेल राबवता यावे यासाठी लवकरच मंत्रालयीन स्तरावर याचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी