देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा २५ सप्टेंबरपासून शुभारंभ

नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान; नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार


मुंबई : डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत २५ सप्टेंबर 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) येथे ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातून देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती महिना (CSAM) 2025 राबविण्यात येणार आहे.


या अभियानाचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, तसेच गृहमंत्रालय, क्रेट-इन (CERT-In), सेबी (SEBI) आणि बीएसई (BSE) यांचे मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.


हे अभियान गृह मंत्रालयाच्या इंडिया सायबरक्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C), इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, क्रेट-इन (CERT-In) यांच्या सहकार्याने राबवले जात असून, उद्योगक्षेत्रातील भागीदार संस्थांनी या उपक्रमात योगदान दिले आहे.


हे अभियान नागरिक, संस्था व भागधारकांना सायबर सुरक्षिततेच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्यास, सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहित करणार आहे. त्याचबरोबर, वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना माहिती दिली जाईल आणि ऑनलाईन सुरक्षित राहण्याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

Comments
Add Comment

घाटकोपर बेकायदेशीर जाहिरात फलक दुर्घटना; संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाहीचे निर्देश

मुंबई : मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता मुंबई : अतिवृष्टी आणि

पाच लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या उपचारांसाठी मिळणार मदत

मुंबई : विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत

राज्यातील १९.२२ लाख शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटींची मदत जाहीर !

मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९

‘ए आय’च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल

निती आयोग करणार सिंधुदुर्गातील ‘ए आय’ प्रकल्पाचा अभ्यास - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : ‘ए आय’

देशात प्रदूषित नद्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल; ५४ नद्यांची भीषण अवस्था, मुंबईतील नद्या मरणासन्न का?

मुंबई : एकेकाळी गावागावांतून वाहणाऱ्या नद्या या जीवनदायिनी होत्या. त्यांचं पाणी पिऊन माणसं जगत होती, शेतं