दर घसरल्याने दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

दर घसरल्याने दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!


बदाम, पिस्ता, खजूर प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त


मुंबई  :खजूर, बदाम, पिस्ता हे खाणे श्रीमंतीचे लक्षण समजले जात होते. सुकामेव्याच्या वाढत्या दरामुळे गोरगरीबांना दिवाळी दसरा सणाच्या कालावधीत खरेदी करणे त्यांना अवघड जात होते. केंद्र सरकारने जीएसटीत केलेल्या बदलामुळे सुकामेव्याची खरेदी आता सर्वांच्या आवाक्यात येणार आहे.


नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे. यामध्ये ड्रायफ्रूट सुकामेव्याचे दर १२ टक्क्यांवरून जीएसटी ५ टक्के करण्यात आले आहे. यामुळे खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर, आक्रोड, जर्दाळू आदी सुकामेवा प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. नवरात्र उत्साहात मोठ्या प्रमाणात उपवास केला जातो.


आयात केली जाते. मागील वर्षाच्या तुलनेत खजुरांच्या भावात २५ टक्के घट झाली आहे. यंदा मात्र केंद्र सरकारने १२ टक्क्यांवरून ५ टक्के जीएसटी केल्याने ड्रायफ्रूट दरात घट झाली असून ३६० चा खजूर २७० पर्यंत आला आहे. यामुळे सामन्यांकडून मागणी वाढणार असून हे दर दसरा, दिवाळीमध्येही असेच राहणार असून सामान्यांची दिवाळी गोड होणार आहे. - नवीन गोयल, ड्रायफ्रूट व्यापारी व दी पूना मर्चंट चेंबर सदस्य


सुकामेव्यातील दरात घट झाल्याने विक्रीत वाढ होऊन दिवाळी दसऱ्यामध्ये गिफ्ट देण्याच्या बॉक्समध्ये सुकामेव्याच्या उलाढालीला गती मिळेल. दिवाळीमध्ये घरी येणाऱ्या पाहूण्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंमध्ये सुकामेव्याच्या पॅकिंग विक्रीतील उलाढाल वाढून मार्केटमधील अर्थकारणात बदल झालेला पाहावयास मिळेल. - अमर चौधरी, नवदुर्गा सुपर मार्केट



आजपासून मार्केटमध्ये असे होणार दर (प्रतिकिलो, रुपयांतील दर)

प्रकार - आताचे दर - जीएसटी कमी केल्यानंतरचे दर

खजूर - ३३६ - ३१५

बदाम - ८९६ - ८४०

पिस्ता  -  १२५० - ११५०

आक्रोड - १२५० - ११५०

अंजीर - १५०० - १३००

खारीक - २८० - २५०

जर्दाळू - ५०० - ४००
Comments
Add Comment

Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून

Maharashtra Lok Bhavan : महाराष्ट्राचे ‘राजभवन’ झाले ‘लोकभवन’; अधिसूचना जारी!

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे

Pratap Sarnaik : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपीडो, उबेर ' सारख्या ॲप आधारित कंपन्या वर गुन्हे दाखल करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

मुंबई : (३ डिसेंबर) शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या '

Orange Gate to Marine Drive Urban Tunnel : मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार, 'ऑरेंज गेट टनेल' जून २०२८ पर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

७०० इमारतींच्या खालून भुयार खणणार मुंबई : भुयारी मेट्रोमुळे सोपा झालेला मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार

Goregoan Traffic : वाहतूक कोंडीत अडकून रुग्णाने रुग्णवाहिकेतच जीव सोडायचा का?

गोरेगावमधील भाजपाच्या माजी नगरसेविकेचा प्रशासनाला संतप्त सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव पूर्व येथील आरे

राज्यात २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झाले मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर

राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल (२ डिसेंबर) मतदान पार पडले. राज्यातील नगरपरिषदा व