'ऋषभ पंत'च्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढणार ?

मुंबई : टीम इंडियामध्ये ऋषभ पंतच्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढली आहे. डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान पायाला फ्रॅक्चर झाला होता, ज्यामुळे तो तीन ते चार आठवडे क्रिकेटपासून दूर राहिला.


ऋषभ पंतला दहा सामने खेळता येणार नाही. यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या व्हाईट-बॉल मालिकेतील आठ सामन्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने आहेत. पंत अद्याप १००% तंदुरुस्त नाही आणि परिणामी, त्याची वेस्ट इंडिज किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता नाही.


भारत २ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पांढऱ्या चेंडूची मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि ८ नोव्हेंबर रोजी संपेल. दोन्ही मालिकांसाठी पंतची उपलब्धता अनिश्चित असल्याचे माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, त्याच्या पायाची सूज अद्याप कमी झालेली नाही. त्याला त्याचे वॉकिंग बूट काढण्यासाठीही काही वेळ हवा आहे.


कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू


वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील १० सामने आता पंतला मुकावे लागणार असल्याने, तो कधी पुनरागमन करणार हे सांगता येत नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल, तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल. कसोटी सामन्यांनंतर, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल, तर पाच टी-२० सामन्यांची मालिका ९ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.

Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो