Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीत भारतीय संघ 'थोडा मागे' आहे आणि न्यूझीलंड दौऱ्यावर श्रीलंकेतील प्रभावी कामगिरीची पुनरावृत्ती करणे कठीण होईल. दोनदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचलेला भारतीय संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी त्यांना आपले उर्वरित बहुतेक सामने जिंकावे लागतील. पुढील वर्षी होणारा अंतिम सामना अव्वल दोन संघांमध्ये खेळला जाईल. जानेवारी २०२७ मध्ये मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामने खेळेल. या दौऱ्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय आणि तितकेच टी-२० सामनेही खेळेल.



द्रविडने सांगितले की, भारत डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात यशस्वी होईल अशी त्यांना आशा आहे. सध्याची परिस्थिती असूनही जर भारत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला, तर ती एक उल्लेखनीय कामगिरी असेल. तो म्हणाला की, भारतीय संघ मागे पडत आहे असे वाटत असले तरी, तो एक खूप मजबूत संघ आहे आणि कोणत्याही स्तरावर त्याला कमी लेखता येणार नाही. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध चांगली सुरुवात केली, त्यामुळे पहिले पाऊल खूप चांगले आहे.



भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दुसऱ्या कसोटीतही त्यांचे पारडे जड आहे. ऑक्टोबरमधील न्यूझीलंड दौऱ्याबाबत द्रविड म्हणाला की, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या निवृत्त क्रिकेचपटूंच्या अनुभवाची कमतरता दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये जाणवेल. तो म्हणाला की, न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणे हे नेहमीच एक आव्हान असते. न्यूझीलंडचा संघ एक मोठे आव्हान उभे करतो. भारताचे अनेक तरुण क्रिकेटपटू न्यूझीलंडसारख्या परिस्थितीत खेळलेले नाहीत, त्यामुळे हे एक मोठे आव्हान असेल. द्रविड म्हणाला की, भारतीय क्रिकेटपटू दौऱ्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असतील अशी आशा असली तरी, त्यांना विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या अनुभवी क्रिकेटपटूंची उणीव भासेल. भारताचा माजी कर्णधार म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशातील मालिकाही सोपी असणार नाही.

Comments
Add Comment

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५

UP T20 League Rinku Singh : ८-८ ओव्हरच्या सामन्यात रिंकू सिंहचा धुमाकूळ; ४१४.२९ च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या २९ धावा!

UP T20 League Rinku Singh : यूपी टी२० लीग २०२६ मध्ये रिंकू सिंहने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. स्पर्धेतील