Navratri 2025 : नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठीचं, मुस्लिमांना 'नो एंट्री' ,विश्व हिंदू परिषदेची कठोर सूचना

नागपुर : देशभरात उत्साहाने सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवार, २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात घरोघरी घट बसतील, देवीची आराधना केली जाईल आणि गरबा महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात येईल. परंतु, विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना दिलेल्या सूचनेनुसार, गरब्यात फक्त हिंदू सहभागी होऊ शकतात; मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, गरब्यासाठी प्रवेश देताना आधार कार्ड तपासणे अनिवार्य असल्याचंही सांगण्यात आले आहे. जर मुस्लिम तरुण गरब्यात सामील झाले तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची सूचना दिली गेली आहे. यासोबतच, बजरंग दल आणि विहिंप यांच्या कार्यकर्त्यांची यावर कडक नजर ठेवली जाणार असल्याचेही माहिती मिळाली आहे. या निर्णयामुळे स्थानिक समाजात आणि सामाजिक माध्यमांवर चर्चेला सुरुवात झाली असून, उत्सवाच्या पारंपरिक आणि सर्वसमावेशक स्वरूपावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.




विहिंपचा इशारा : आधार कार्ड तपासूनच गरब्यात प्रवेश द्या


नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरमध्ये आयोजित गरबा उत्सवावर विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दल यांच्याकडून ठळक सूचना देण्यात आल्या आहेत. विहिंपने गरबा आयोजकांना स्पष्ट सांगितले आहे की, उत्सवात फक्त हिंदू सहभागी होऊ शकतात, मुस्लिम तरुणांना प्रवेश देऊ नये. विहिंपच्या माहितीनुसार, काही मुस्लिम तरुण गरबा उत्सवात लपून प्रवेश करून सहभागी होतात, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आधार कार्ड तपासूनच प्रवेश देणे अनिवार्य असल्याचेही सूचित करण्यात आले आहे. जर कोणत्याही मुस्लिम तरुणाने गरब्यात प्रवेश केला, तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदने दिला आहे. याशिवाय, येत्या काळात सर्व नवरात्र उत्सव आणि गरबा कार्यक्रमांवर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची कडक नजर राहणार आहे. या सूचनेसंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना अधिकृत सूचना आणि विनंती पत्र दिले जाणार असल्याचेही समजते.

Comments
Add Comment

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा

Nagpur News : नागपूरमध्ये २८ वर्षीय एअर होस्टेसची गळफास घेऊन आत्महत्या; मध्यरात्री प्रियकराशी फोनवर बोलली अन्...

नागपूर : नागपूरमधील लकडगंज (Nagrpur News) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. नुकतीच

Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात आता 'एआय'साठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महावितरणची आर्थिक पुनर्रचना करणार मुंबई : राज्याच्या प्रशास

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंती मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग