अदानी समुहाचे गुंतवणूकदार एका दिवसात मालामाल? Market Capitalisation एका दिवसात ६०००० कोटींनी वाढले

प्रतिनिधी:अदानी समुहाच्या बाजारी भांडवलात (Market Capitalisation) मध्ये कालपर्यंत ६९००० कोटींची वाढ भागभांडवलधारकांना प्राप्त झाली आहे. विशेषतः कालच्या अदानी समुहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात बाजारी भांडवलात मोठी वाढ झाली. सेबी (Security Exchange Board of India SEBI) ने हिंडनबर्ग प्रकरणात गौतम अदानी व त्यांच्या अदानी समुहाला दिली आहे. त्यामुळे कंपनीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास परावर्तित झाल्याने काल कंपनीचे शेअर वाढले.यामुळेच स्टॉकफे रफार (Stock Manipulation) आणि संबंधित पक्षाच्या गैरवापराचे आरोप फेटाळून लावणाऱ्या नियामकाच्या (SEBI) आदेशामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि अदानी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. या आरोपात आघाडीवर असलेल्या अदानी पॉवरने १२.४०% वाढ केली आणि समूहाच्या सूचीबद्ध (Listed) कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ करणारा शेअर ठरला आहे .स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, अदानी टोटल गॅसने ७.३५% वाढ केली, तर अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एंटरप्रायझेस अनुक्रमे ५.३३% आणि ५.०४% वाढले. अदानी एनर्जी सोल्युशन्सने ४.७०% वाढ केली, ज्यामुळे ४.५% पेक्षा जास्त नफा मिळवणाऱ्या कंपन्यांची यादी पूर्ण झाली.


या गतीमध्ये भर घालत नवा ट्रिगर व नवे भाकीत करता मॉर्गन स्टॅनलीने अदानी पॉवरवर कव्हरेज सुरू केले होते जे रिसर्चने एका दशकाहून अधिक काळातील केलेली ही पहिलीच शिफारस आहे. हे पाऊल केवळ किरकोळ गुंतवणूकदारांम ध्येच नव्हे तर जाग तिक संस्थात्मक भागधारकांमध्येही (FIi) विश्वास परत येत आहे, जे हिंडनबर्ग-ट्रिगर क्रॅशपासून मोठ्या प्रमाणात बाजूला राहिले होते.२०२३ च्या सुरुवातीला अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांना समर्थन देण्यासाठी सेबीने तपास पूर्ण के ल्यानंतर एका दिवसातच ही तेजी आली आहे. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात शेअर्समध्ये तेजी पहायला मिळाली होती. मात्र बाजारातील अस्थिरतेचा फटका बसलेले शेअर काल मोठ्या प्रमाणात उसळले होते.


यापूर्वी गैरप्रकाराचा आरोपांमुळे अदानी समूहाच्या समभागांचे बाजारमूल्य (Market Capitalisation) त्यांच्या शिखरावर असताना सुमारे १५० अब्ज डॉलर्सने कमी झाले होते ज्यामुळे प्रशासन, पारदर्शकता आणि राजकीय प्रभाव यावर जागतिक चर्चा सुरू झा ली होती. म्हणूनच, क्लीन चिट हा समूहासाठी एक महत्त्वाचा क्षण आणि नवे उड्डाण घेण्यापूर्वी सेबीची स्पष्टता गुंतवणूकदारांसाठी नवसंजीवनी ठरू शकते.अदानी समूहाच्या कंपन्यांनी काल एक्सचेंजेसवरील टॉप गेनर लिस्टमध्ये वर्चस्व गाजवले आणि तसेच या नि मित्ताने काउंटरमधील गुंतवणूकदारांच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये मोठी वाढ झाली आहे. ऊर्जा-संबंधित समभागांमध्ये (Energy Stocks) ही तेजी विशेषतः लक्षणीय होती परंतु त्याचा परिणाम संपूर्ण समूहात, त्यांच्या प्रमुख इनक्यूबेटर कंपनीपासून ते त्यांच्या मीडिया शाखेपर्यंत (NDTV) पर्यंत व्यापक होता. त्यामुळे या शेअर्समध्ये विश्वासाचा परिणाम म्हणून ' गुडविल' रॅली झाली होती.अदानी पॉवरने दिवसभरात ५२ आठवड्यांचा उच्चांक (All time High) गाठला. अदानी इंडस्ट्रीजचा शेअर १.४१%, एसीसीचा शेअर १.२१% अदानी पोर्ट्सचा शेअर १.०९% आणि अंबुजा सिमेंट्सचा शेअर ०.२८% वधारला होता.

Comments
Add Comment

REIL: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडची भारतातील एआय इकोसिस्टिम उभारण्यासाठी मोठी घोषणा

मोहित सोमण: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडने आज मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण उपकंपनी

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून रशियन तेल आयात कपातीविषयक मोठे स्पष्टीकरण अद्याप सस्पेन्स कायम !

मोहित सोमण:रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत कपात करण्याचे ठरवले अशी माहिती

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.