Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात हलक्या सरी बरसू शकतात, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे.

असे असेल मुंबईचे हवामान:


मुंबईत पुढील दोन-तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

राज्यातील इतर भागांचा अंदाज:


मध्य महाराष्ट्र: पुणे, नाशिक, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे.

विदर्भ: विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना पावसाच्या तयारीने बाहेर पडावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता


शुक्रवारपासून राज्यभरात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील तर काही ठिकाणी अधून-मधून पाऊस कोसळू शकतो. दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आले. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, मोसमी वाऱ्यांनीही मंगळवारी काही भागातून माघार घेतली आहे.
Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी