कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद


मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. दरम्यान, आज अंबाबाईचे मंदिर दिवसभर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.


शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता केली जाईल. यामुळे दिवसभर गाभाऱ्याचा दरवाजा बंद राहील. यामुळे भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही.


सकाळी साडे आठ वाजल्यापासून आय स्मार्ट फॅसिटेक कंपनीकडून गाभाऱ्याची स्वच्छता केली जाईल. वॉटर जेट मशिनच्या मदतीने ही स्वच्छता केली जाईल. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ही स्वच्छता पूर्ण होईल. ही स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन आधीसारखे सुरू होईल अशी माहिती देवस्थानाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, महासरस्वती मंदिरात अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्याची सोय भाविकांसाठी करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीपूजक मंडळाने दिली आहे.
Comments
Add Comment

PUNE : पुण्यातील 'या' गणपती मंदिराचं अनोखे रहस्य! वर्षातून फक्त एकदाच उघडतं तळघर; 270 वर्षांची अनोखी परंपरा

पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांमध्ये गणल्या जाणाऱ्या सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती

Kolhapur Bull Incident Video : कोल्हापुरात बैलजोडी शर्यतीत थरार! बिथरलेला बैल जमावात घुसला अन् थेट...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील भादगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलजोडी सौंदर्य आणि ताकद

Akkalkot : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा म्हाडामार्फत होणार नियोजनबद्ध विकास

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष नियोजन प्राधिकरणास मान्यता मुंबई : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी

School Bus Accident : क्षणभरात होणार होती मोठी दुर्घटना; चालकाला चक्कर, शाळेची बस डिव्हायडरवर चढली

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील जळगाव रोड (Jalgaon Road) परिसरात बुधवारी शाळेच्या बसचा (School Bus)

Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा महासागर; मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नगरी अक्कलकोटमध्ये (Akkalkot) गुरुपौर्णिमा उत्सवासाठी (Guru Purnima 2026) जय्यत तयारी

Maharashtra Rain Alert : 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान