...म्हणून या दिवसापासून मोनोरेल सेवा बंद

मुंबई : आधुनिकीकरणाचे काम करता यावे म्हणून मुंबईची मोनोरेल सेवा शनिवार २० सप्टेंबर २०२५ पासून काही दिवसांसाठी बंद केली जाणार आहे. मोनोरेल पुन्हा कधी सुरू करणार याची माहिती एमएमआरडीए योग्य वेळी देणार आहे. मोनोरेल १९ ऑगस्टपासून १७ सप्टेंबर दरम्यान महिन्याभरात तीन वेळा बंद पडली. प्रवाशांचे हाल झाले. याची गंभीर दखल घेऊन आधुनिकीकरणाचे काम करण्यासाठी मोनोरेल काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे एमएमआरडीएने जाहीर केले.

सेवा बंद असताना मोनोरेलची सिस्टिम अपग्रेड केली जाईल. नवीन रोलिंग स्टॉकचे जलद एकत्रीकरण, प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग अपग्रेड आणि विद्यमान ताफ्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा मोनोरेलमधील प्रवास आणखी सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे. अत्याधुनिक सिग्नलिंग सिस्टम, हैदराबादमध्ये विकसित केलेली अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टम (सीबीटीसी) मोनोरेलमध्ये बसविली जाईल.

आधुनिकीकरणाचे काम केल्यानंतर आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा तपासण्या केल्या जातील. यानंतर मोनोरेल पुन्हा कधी सुरू करायची याचा निर्णय तंत्रज्ञांच्या सल्ल्याने घेतला जाईल. एमएमआरडीए प्रसिद्धीपत्रक काढून मोनोरेल कधी सुरू करणार याची माहिती योग्य वेळी देईल.

एमएमआरडीएने २४६० कोटी रुपये खर्च करून उभारलेली २० किमी लांबीची चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल सेवा तोट्यात आहे. प्रवाशांचा अपुरा प्रतिसाद, गाड्यांचे वारंवार होणारे अपघात आणि तांत्रिक बिघाडांमुळे मोनोरेल पुढील समस्या वाढत आहेत.

१९ ऑगस्ट २०२५ - म्हैसूर कॉलनीजवळ मोनोरेल बंद, अडकलेल्या प्रवाशांची अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका, सेवा काही तास ठप्प
२१ ऑगस्ट २०२५ - तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटांसाठी मोनोरेल बंद
१५ सप्टेंबर २०२५ - वडाळ्याजवळ एका मार्गावरील मोनोरेल काही काळ बंद
Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा