काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या दौऱ्यांनाही सुरूवात झाली आहे. त्यातच आज भाजप पक्षाने मुंबईत विजय संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.


तसेच आगामी महापालिका निवडणुकीत महापौर हा महायुतीचाच असणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नुकतीच मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक पार पडली होती. यात ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचा फडणवीस यांनी यावेळी दाखला दिला. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.



काहीही झाले तर महायुतीचाच महापौर


२०२४मध्ये राज्यात महायुतीचे सरकार आम्ही आणून दाखवले. महापालिकेच्या निवडणुकीतही पुन्हा महायुतीचे सरकारच येणार. काहीही झाले तर महायुतीचाच महापौर केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.



निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजला


काही दिवसांपूर्वी मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक पार पडली होती. यात ठाकरे बंधूंचा पराभव झाला होता. आमच्या उमेदवारांनी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजवला. लक्षात ठेवा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते. मात्र तुम्ही नाहीत. केवळ नाव लावल्याने कोणी ब्रँड होत नाही. आमच्या पक्षातील परंपरा बघा. आशिष शेलार यांच्यानंतर त्यांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही तर अमित साटम हे सामान्य कार्यकर्ते मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे. ते म्हणजे नरेंद्र मोदी. असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास