काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या दौऱ्यांनाही सुरूवात झाली आहे. त्यातच आज भाजप पक्षाने मुंबईत विजय संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.


तसेच आगामी महापालिका निवडणुकीत महापौर हा महायुतीचाच असणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नुकतीच मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक पार पडली होती. यात ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचा फडणवीस यांनी यावेळी दाखला दिला. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.



काहीही झाले तर महायुतीचाच महापौर


२०२४मध्ये राज्यात महायुतीचे सरकार आम्ही आणून दाखवले. महापालिकेच्या निवडणुकीतही पुन्हा महायुतीचे सरकारच येणार. काहीही झाले तर महायुतीचाच महापौर केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.



निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजला


काही दिवसांपूर्वी मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक पार पडली होती. यात ठाकरे बंधूंचा पराभव झाला होता. आमच्या उमेदवारांनी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजवला. लक्षात ठेवा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते. मात्र तुम्ही नाहीत. केवळ नाव लावल्याने कोणी ब्रँड होत नाही. आमच्या पक्षातील परंपरा बघा. आशिष शेलार यांच्यानंतर त्यांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही तर अमित साटम हे सामान्य कार्यकर्ते मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे. ते म्हणजे नरेंद्र मोदी. असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची