साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मार्केटमध्ये भाव मिळत नसल्याने शेतकरी सद्यस्थितीला कांदा विक्री न करता साठवणूक करून ठेवत आहे. मात्र शेडमध्ये साठवणूक करून ठेवलेला कांदा देखील आता सडू लागला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.


अर्थात एकीकडे भाव नाही तर दुसरीकडे कांदा खराब होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आज ना उद्या कांद्याला भाव मिळेल; या आशेपोटी शेतकरी दिनेश पाटील यांनी चार महिन्यापासून १०० क्विंटल पेक्षा जास्त कांदा शेडमध्ये साठवून ठेवला होता. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यापासून कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे कांदा शेडमध्येच खराब होण्यास सुरुवात झाली. यामुळे काही कांदा पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे मजबुरीने विक्री करावा लागला. परंतु त्यापेक्षा कांद्याला जास्तीचा दर मिळाला नाही आणि त्यामुळे उर्वरित कांदा चाळीमध्येच खराब होऊ लागला.


साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने २० ते २५ क्विंटल कांदा उकीरड्यावर फेकण्याची वेळ शेतकरी दिनेश पाटील यांच्यावर आली. यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी कांद्याला तीन हजार पर्यंतचा दर मिळत होता. या अपेक्षेनेच या वर्षी देखील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. मात्र पाचशे ते आठशेचा भाव कांद्याला मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा