प्रकाश महाजन यांनी दिला मनसेचा राजीनामा, पुढे काय करणार ?


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसेला धक्का बसला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे. ते मनसेतून बाहेर पडले आहेत. मागील काही काळापासून प्रकाश महाजन हे मनसेच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर होते. मनसेच्या नाशिकच्या मेळाव्याला प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आले नव्हते. प्रवक्ते असूनही प्रकाश महाजन यांना पक्षाने प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती. अखेर प्रकाश महाजन यांनी प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत मनसेतून बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे.


प्रकाश महाजन यांनी राजीनामा देण्याचे कारण स्वतः जाहीर केलेले नाही. तसेच मनसेतून बाहेर पडल्यानंतर पुढे काय करणार याबाबतही माहिती दिलेली नाही.


भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे बंधू असलेल्या प्रकाश महाजन यांनी काही वर्षांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला होता. प्रमोद महाजन यांची हत्या झाली. यानंतर काही दिवसांनी प्रकाश महाजन राजकारणात सक्रीय झाले.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच ते पक्षामध्ये होते. मराठवाड्यातील मनसेचा प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रांमध्ये ते मनसेचे प्रवक्ते म्हणून सहभागी होत होते.


Comments
Add Comment

बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते' खुलासे

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोला मुंबई : "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख