प्रकाश महाजन यांनी दिला मनसेचा राजीनामा, पुढे काय करणार ?


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसेला धक्का बसला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे. ते मनसेतून बाहेर पडले आहेत. मागील काही काळापासून प्रकाश महाजन हे मनसेच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर होते. मनसेच्या नाशिकच्या मेळाव्याला प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आले नव्हते. प्रवक्ते असूनही प्रकाश महाजन यांना पक्षाने प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती. अखेर प्रकाश महाजन यांनी प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत मनसेतून बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे.


प्रकाश महाजन यांनी राजीनामा देण्याचे कारण स्वतः जाहीर केलेले नाही. तसेच मनसेतून बाहेर पडल्यानंतर पुढे काय करणार याबाबतही माहिती दिलेली नाही.


भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे बंधू असलेल्या प्रकाश महाजन यांनी काही वर्षांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला होता. प्रमोद महाजन यांची हत्या झाली. यानंतर काही दिवसांनी प्रकाश महाजन राजकारणात सक्रीय झाले.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच ते पक्षामध्ये होते. मराठवाड्यातील मनसेचा प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रांमध्ये ते मनसेचे प्रवक्ते म्हणून सहभागी होत होते.


Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला