भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी


नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया कप २०२५ स्पर्धेतील सामना होणार आहे. हा सामना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संबंध अत्यंत बिघडले आहेत. भारतातील अनेकांनी या सामन्याला विरोध करताना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर हा सामना होत आहे. मात्र आता असे समोर येत आहे की, बीसीसीआयकडून 'अदृश्य बहिष्कार' या सामन्यावर टाकण्यात येणार आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्याचा बहिष्कार करण्याचा विचार केला आहे. अलीकडेच झालेल्या पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून हा सामना रद्द करण्याची मागणी होत आहे. बीसीसीआय (BCCI) चे कुठलेही वरिष्ठ अधिकारी अद्याप दुबईला पोहोचलेले नाहीत. पहलगाव हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरमुळे निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.


सचिव देवजीत सैकिया हे महिला वनडे विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त असल्याने सामन्याला उपस्थित राहणार नाहीत. आयपीएल चेअरमन अरुण धूमल यांनीदेखील दुबईला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कार्यकारी अध्यक्ष राजीव शुक्ला, जे एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC)चे सदस्य आहेत, ते या सामन्यात उपस्थित राहू शकतात. तसेच, आयसीसी चेअरमन जय शहा हे अमेरिकेत महत्त्वाच्या बैठकींमध्ये व्यस्त असल्याने दुबईत येणार नाहीत.



सरकारच्या निर्णयावर बीसीसीआय अवलंबून


बीसीसीआय अनेकदा स्पष्टपणे सांगत आलं आहे की, पाकिस्तानविरुद्ध खेळायचं की नाही हे पूर्णपणे भारत सरकारच्या भूमिकेवर अवलंबून आहे. यापूर्वीही भारताने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा बहिष्कार केला होता. त्यावेळी स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर घेण्यात आली होती आणि भारताने आपले सर्व सामने यूएईत खेळले होते.



भारत आणि पाकिस्तान टी-२० मध्ये कोण वरचढ?


आशिया कप टी-२० स्वरूपात खेळला जात आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने १० सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त तीन वेळा विजय मिळवला आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की टी-२०मध्ये भारताची थोडीशी आघाडी आहे, ज्यामुळे भारतीय संघाला मानसिक फायदा देखील मिळतो.

Comments
Add Comment

Indian Team Schedule : जुलै महिन्यात भारतीय संघ किती सामने खेळणार ? जाणून घ्या संपू्र्ण वेळपत्रक; इंग्लंडमध्ये किती सामने होणार ?

मुंबई : भारतीय संघ पुढच्या महिन्यात (जुलै) इंग्लंच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन दिग्गज पुनरागमन करणार

Vaibhav Sooryvanshi : आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास ! रोहित- हार्दिकचा विक्रम मोडणार ?

Mumbai: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज (२६ जून) पासून दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा

FIFA WORLDCUP 2026 : ऑस्ट्रेलियाची बाद फेरीत धडक; पॅराग्वेच्याही आगेकूचची शक्यता

सँटा क्लारा, कॅलिफोर्निया : ऑस्ट्रेलिया आणि पॅराग्वे यांच्यातील सामना गोलशून्य (०-०) बरोबरीत सुटल्यामुळे 'सॉकरूस'

FIFA WORLDCUP 2026 : जपान आणि स्वीडनची बाद फेरीत धडक; सामना १-१ ने अनिर्णित

अर्लिंग्टन, टेक्सास : जपान आणि स्वीडन यांच्यातील अटीतटीचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला असला तरी, या निकालासह

FIFA WORLDCUP 2026 : डच संघाचा दणदणीत विजय; ट्युनिशियाला नमवून विश्वचषकाच्या बाद फेरीत अव्वल स्थान

कॅन्सस सिटी, मिसूरी: पावसाळी हवामान आणि विजांच्या कडकडाटाच्या व्यत्ययानंतरही नेदरलँड्सने ट्युनिशियावर ३-१ असा

FIFA WORLDCUP 2026 : इक्वेडोरची ऐतिहासिक कामगिरी; जर्मनीवर मात करत विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक

ईस्ट रदरफोर्ड, एनजे : गोंझालो प्लाटाच्या निर्णायक गोलच्या जोरावर इक्वेडोरने बलाढ्य जर्मनीवर २-१ ने विजय मिळवत