भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी


नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया कप २०२५ स्पर्धेतील सामना होणार आहे. हा सामना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संबंध अत्यंत बिघडले आहेत. भारतातील अनेकांनी या सामन्याला विरोध करताना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर हा सामना होत आहे. मात्र आता असे समोर येत आहे की, बीसीसीआयकडून 'अदृश्य बहिष्कार' या सामन्यावर टाकण्यात येणार आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्याचा बहिष्कार करण्याचा विचार केला आहे. अलीकडेच झालेल्या पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून हा सामना रद्द करण्याची मागणी होत आहे. बीसीसीआय (BCCI) चे कुठलेही वरिष्ठ अधिकारी अद्याप दुबईला पोहोचलेले नाहीत. पहलगाव हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरमुळे निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.


सचिव देवजीत सैकिया हे महिला वनडे विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त असल्याने सामन्याला उपस्थित राहणार नाहीत. आयपीएल चेअरमन अरुण धूमल यांनीदेखील दुबईला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कार्यकारी अध्यक्ष राजीव शुक्ला, जे एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC)चे सदस्य आहेत, ते या सामन्यात उपस्थित राहू शकतात. तसेच, आयसीसी चेअरमन जय शहा हे अमेरिकेत महत्त्वाच्या बैठकींमध्ये व्यस्त असल्याने दुबईत येणार नाहीत.



सरकारच्या निर्णयावर बीसीसीआय अवलंबून


बीसीसीआय अनेकदा स्पष्टपणे सांगत आलं आहे की, पाकिस्तानविरुद्ध खेळायचं की नाही हे पूर्णपणे भारत सरकारच्या भूमिकेवर अवलंबून आहे. यापूर्वीही भारताने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा बहिष्कार केला होता. त्यावेळी स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर घेण्यात आली होती आणि भारताने आपले सर्व सामने यूएईत खेळले होते.



भारत आणि पाकिस्तान टी-२० मध्ये कोण वरचढ?


आशिया कप टी-२० स्वरूपात खेळला जात आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने १० सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त तीन वेळा विजय मिळवला आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की टी-२०मध्ये भारताची थोडीशी आघाडी आहे, ज्यामुळे भारतीय संघाला मानसिक फायदा देखील मिळतो.

Comments
Add Comment

Smruti Mandhana : स्मृती मानधना टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकी महिला संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला

IPL 2026 : गुजरातचा कोलकातावर पाच गडी राखून विजय

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी

Mumbai Cricket Team : मुंबई क्रिकेट संघाचा ऐतिहासिक निर्णय; मुंबईचे खेळाडू होणार मालामाल, मिळणार लाखोंचा पगार

मुंबई :  मुंबईतून अधिकाधिक हिरे भारतीय क्रिकेट संघाला मिळावेत यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने हे महत्वपूर्ण पाऊल

IPL 2026 MI vs PBKS : "काही कठीण निर्णय घेण्याची गरज आली आहे - हार्दिक पांड्या" ; मुंबईच्या अंतर्गत वादाचा खेळावर परिणाम?

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सात गडी राखून

IPL : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव, पंजाबचा विजय, किंग्स झाले IPL टॉपर

मुंबई : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका कायम राखली. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे

Pat Cummins, IPL 2026 : पॅट कमिन्स आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी सज्ज; गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त

मुंबई : सिडनीमध्ये नुकत्याच झालेल्या स्कॅननंतर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कोणत्याही