अरे बापरे! उड्डाणानंतर विमानाचे चाकच धावपट्टीवर पडले

मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग


मुंबई: गुजरातमधील कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाचे बाहेरील चाक उड्डाणानंतर लगेचच धावपट्टीवर निखळून पडले. त्यामुळे हे विमान  मुंबईत उतरताना पायलटने आपत्कालीन स्थिती जाहीर केली होती, मात्र सुदैवाने अनर्थ टळला आणि विमान सुरक्षितपणे मुंबईच्या धावपट्टीवर उतरले. 


उड्डाणानंतर विमानाचे चाक धावपट्टीवर पडले


झाले असे की, स्पाइसजेटच्या बॉम्बार्डियर DHC8-400 या विमानाने, ज्याचा उड्डाण क्रमांक SG-2906 होता, शुक्रवारी दुपारी २.३९ वाजता कांडला विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २३ वरून उड्डाण केले. उड्डाणानंतर लगेचच टॉवर कंट्रोलरला धावपट्टीवर विमानातून एक मोठी काळी वस्तू पडताना दिसली. दरम्यान तपासणी पथकाने जाऊन पाहिले तेव्हा तिथे विमानाचे चाक पडलेले त्यांना आढळले. 





मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) दुपारी १५:५१ वाजता तांत्रिक बिघाडाची नोंद झाल्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. खबरदारी म्हणून विमानतळ प्रशासनाने संपूर्ण आणीबाणी जाहीर केली होती. तथापि, विमान धावपट्टी क्रमांक २७ वर सुरक्षितपणे उतरले. विमानात क्रूसह सुमारे ७८ प्रवासी होते. ते सर्व सुरक्षित आहेत. लँडिंगनंतर विमानतळावर सामान्य कामकाज पूर्ववत करण्यात आले. बॉम्बार्डियर DHC8-400 मध्ये एक ट्रायसायकल लँडिंग गियर सिस्टम आहे, ज्याच्या नोज गियरवर दोन चाके आहेत आणि प्रत्येक मुख्य लँडिंग गियरवर दोन मुख्य चाके आहेत.


स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, '१२ सप्टेंबर रोजी कांडलाहून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेट Q400 विमानाचे बाहेरील चाक टेकऑफनंतर धावपट्टीवर निखळून पडले. मात्र, विमानाने मुंबईकडे प्रवास सुरू ठेवला आणि विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. लँडिंगनंतर, विमान टर्मिनलवर पोहोचले आणि सर्व प्रवासी सुखरूप उतरले.

Comments
Add Comment

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी