कॉरिडॉरसाठी आमची घरं-दारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडा

दुकानदाराच्या विचित्र वक्तव्याने भाविक संतप्त


सोलापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा बाबत शहरातील एका दुकानदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याचा वारकरी संप्रदायासह भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमची घरं-दारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडावा, अशी अचंबित करणारी आणि चिड निर्माण करणारी विचित्र मागणी त्याने केली आहे. कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत रा.पा.कटेकर नावाच्या दुकानदाराने हे वादग्रस्त वक्तव्य केले.

वारकरी संप्रदायाच्या भावनेला व विठ्ठल मंदिराला हात घातल्याने सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. विठ्ठल दर्शनासाठी येणा-या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः यासाठी आग्रही आहेत. कॉरिडॉरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी, दुकानदार आणि रहिवासांशी अनेक वेळा बैठका घेतल्या. शासनाची भूमिका त्यांना समजावून सांगितली. तरीही येथील या दुकानदाराने अशी बेताल वक्तव्य केल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार