माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर नर्तिका पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये वाढ!

बीड: बीडच्या गेवराईतील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या आहे की घातपात यावरून सध्या बरीच उलटसुलट चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, गोविंद बर्गे यांच्या मृत्युमागे पूजा गायकवाड नामक एका नर्तकीचा हात असल्याचा दावा बर्गे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात बर्गे यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजाविरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर न्यायालयीन सुनावणीत या नर्तकीला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत.

बर्गे यांच्या मृत्यूप्रकरणातली नर्तिका पूजा गायकवाड हिचं नाव सातत्याने समोर येत असून तिच्या प्रेमात अखंड वेडा झालेल्या बर्गे यांनी तिच्यामुळेच आपले आयुष्य संपवलं असल्याचे काहीचं म्हणणं आहे. या आत्महत्येनंतर पूजा गायकवाड बरीच चर्चेत असून सोशल मीडियावरही तिच्या नावाची खूप चर्चा सुरू आहे. पूजा गायकवाड कोण आहे? हे पाहण्यासाठी लोकं तिच्या सोशल मिडियावर अकाऊंटवर गर्दी करताना पहायला मिळत आहे.

कोण आहे पूजा गायकवाड?





नर्तिका असलेल्या पूजाचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून, त्यावर ती तिचे रील्स टाकत असते. विशेष बाब म्हणजे, ही घटना घडण्यापूर्वी म्हणजेच केवळ २ दिवस आधी पूजाचे  फॉलोअर्स अवघे ५००-७०० इतकेच होते. मात्र गोविंद बर्गे मृत्यूप्रकरण समोर आल्यानंतर तिच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दि. १२ सप्टेंबरपर्यंत तिचे एकूण ३१  हजार फॉलोअर्स झाले आहेत. ज्यात काही दिवसांत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार