Asia Cup 2025: यूएईवर विजय मिळाल्यानंतर या भारतीय क्रिकेटरला मिळाला खास अवॉर्ड

दुबई: आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विजयी सलामी दिली आहे. युएई (UAE) विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा एक महत्त्वाचा शिल्पकार ठरला तो अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे. आपल्या भेदक गोलंदाजीने त्याने सामन्यावर मोठा प्रभाव पाडला आणि त्याला 'इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच' (Impact Player of the Match) म्हणून गौरवण्यात आले.



असा रंगला सामना


दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजीसमोर युएईचा संघ पूर्णपणे ढेपाळला. युएईचा संघ अवघ्या ५७ धावांवर गारद झाला. त्यांच्याकडून अलीशान शराफू (२२) आणि मुहम्मद वसीम (१९) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.


भारतासाठी गोलंदाजीत कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) चमकदार कामगिरी केली, त्याने ४ बळी घेतले. तर, शिवम दुबेने २ षटकांत केवळ ४ धावा देत ३ महत्त्वाचे बळी मिळवले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), अक्षर पटेल (Axar Patel) आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांना प्रत्येकी १ बळी मिळाला.



शिवम दुबेच्या कामगिरीचे कौतुक


आयपीएलमध्ये 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे शिवम दुबेला गोलंदाजीची संधी फारशी मिळाली नव्हती. मात्र, भारतीय संघात त्याला मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल (Morne Morkel) यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा केल्या आहेत. युएई विरुद्धच्या सामन्यातील त्याची प्रभावी कामगिरी याच सुधारणांचे प्रतीक आहे. बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी शिवम दुबेला ड्रेसिंग रूममध्ये 'इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच' चा पुरस्कार देताना दाखवले आहे.



भारताचा दणदणीत विजय


युएईने ठेवलेल्या ५८ धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने जोरदार सुरुवात केली. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) ने १६ चेंडूत ३० धावांची वेगवान खेळी केली. तर, शुभमन गिलने (Shubman Gill) ९ चेंडूत २० धावा काढल्या. भारताने केवळ ४.३ षटकांत १ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले आणि ९३ चेंडू बाकी असतानाच हा सामना जिंकला. या विजयामुळे भारताचा नेट रन रेटही (Net Run Rate) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता भारतीय संघ आपला पुढील सामना १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) खेळणार आहे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)