गणेशोत्सव काळात एसटीला बाप्पा पावला

१ कोटी ८० लाखांचे उत्पन्न; ३१,५४६ प्रवाशांचा प्रवास


पालघर(प्रतिनिधी) : पालघर एसटी विभागाच्या माध्यमातून गणेशोत्सवात कोकणाकडे आणि परतीसाठी एकूण ७०६ विशेष बसगाड्या सोडण्यात आल्या, ज्यामुळे तब्बल ३१,५४६ प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, विशेष नियोजनामुळे एसटी महामंडळाला या काळात सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
गणेशोत्सव आणि गौरी उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय लक्षात घेऊन, पालघर एसटी विभागाकडून विशेष बससेवांचे नियोजन करण्यात आले होते. २३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या बसगाड्यांची गर्दी लक्षात घेता, विभागाकडून ६५५ बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये पालघर विभागाच्या स्वतःच्या १४२ बसेससह इतर विभागांकडूनही अतिरिक्त बसेस मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये नागपूर प्रदेशातून १५०, अमरावती प्रदेशातून १७३ आणि रत्नागिरी विभागातून ९९ बसेसचा समावेश होता.


बसेस विरार, मानवेल पाडा, नालासोपारा, नवघर आणि वसई अर्नाळा येथून सोडण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांची सोय झाली. या बसेससाठी प्रवाशांनी आगाऊ बुकिंग केले होते. गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या ५६७ बसेसने २५,६६८ प्रवाशांना घेऊन प्रवास केला, ज्यामुळे एसटीला १,४६,९४,२५५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गणेशोत्सवानंतर कोकणहून पालघरकडे परतणाऱ्या प्रवाशांसाठीही विशेष बससेवा सुरू करण्यात आली होती. यामध्ये पालघर विभागाच्या १३९ बसेसद्वारे वाहतूक करण्यात आली. या परतीच्या प्रवासात ५,५६० प्रवाशांनी प्रवास केला, ज्यामुळे ३३,५४,५४२ रुपयांचे उत्पन्न मिळाले.


एकंदरीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व परत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोडलेल्या ७०६ बसेसने एकूण ३१,५४६ प्रवाशांची ने-आण केली आणि एसटी महामंडळाला १,८०,४८,७९७ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी