थोड्याच वेळात होणार लालबागच्या राजाचं विसर्जन


मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांचा अलोट जनसागर उसळला आहे. अनंत चतुर्दशी संपली आणि रविवारची सकाळ उजाडली तरी लालबागच्या राजाचे विसर्जन अद्याप झालेले नाही. गणपतीची मूर्ती समुद्रात नेण्यात आली आहे. थोड्याच वेळात होणार लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा महाराजा यांसह इतर काही मंडळांचे बाप्पा विसर्जनासाठी चौपाटीवर पोहोचले आहेत. अने मंडळांची शेवटची आरती झाली आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. रविवार दुपारपर्यंत मुंबईतील सर्व गणपती विसर्जन पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.





गणेशोत्सवात आनंदाने सहभागी झालेल्या मुंबईकरांचा उत्साह विसर्जन मिरवणुकीतही कायम होता. पण समुद्रावर लाडक्या बाप्पााला निरोप देताना गणेशभक्तांना भावना अनावर झाल्या. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन रविवारच्या सकाळपर्यंत झाले होते. शनिवारी सकाळी मंडपातून सुरू झालेली लालबागच्या राजाची मिरवणूक रविवारी गिरगाव चौपाटीवर पोहोचली. शेवटची आरती झाल्यानंतर लालबागच्या राजाला विसर्जनासाठी समुद्रात नेण्यात आले. हजारो भाविकांनी समुद्रात उतरुन पोहत पोहत लाडक्या गणरायाला नमस्कार केला आणि साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. 


अनंत अंबानींच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक


उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सदस्य अनंत अंबानी यांच्या उपस्थितीत लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक दिमाखात गिरगाव चौपाटीवर आली. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय गिरगाव चौपाटीवर पोहोचला.


Comments
Add Comment

मुलांचे 'डिजिटल व्यसन' सुटणार! राज्य सरकारकडून तज्ज्ञांची 'टास्क फोर्स' नियुक्त; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

मुंबई : मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाबाबत आणि त्याचा होणारा दुष्परिणाम लक्षात घेता याबाबत अभ्यास

Legislative Council Election 2026 : कोणाचा पत्ता कटणार आणि कोणाला लॉटरी लागणार ? विधान परिषदेच्या 'या' ९ जागा होणार रिक्त!

मुंबई : येत्या १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी रणधुमाळी उडणार आहे. सध्याचे संख्याबळ

'रो-रो'च्या माध्यमातून महत्त्वाचे जिल्हे आणि राज्ये मुंबईशी जोडणार - मंत्री नितेश राणे यांची माहिती

जलमार्गांचे जाळे उभारण्याची मुख्यमंत्र्यांची संकल्पना सत्यात उतरवणार मुंबई : "शिमग्याच्या निमित्ताने कोकणात

मुंबईत २७,२८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा

Epstein Files : एपस्टाईन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर 'या' देशाच्या पंतप्रधानांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात एपस्टाईन फाइल्समुळे गोंधळ उडाला आहे. अशातच या फाइल्समध्ये नाव आलेल्या एका

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील