मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी पंपांवर मोठी गर्दी झाली. रात्री १२ वाजता सीएनजीचे दर ५० पैशांनी वाढले. दर बदलाची प्रक्रिया सुरू असताना जवळपास अर्धा तास पंप बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांच्या रांगा प्रचंड वाढल्या होत्या. सीएनजीपंपाबाहेर रात्रीच्या वेळीच शेकडो वाहने थांबल्याने मोठा खोळंबा झाला.



कोकणात गेलेले हजारो गणेशभक्त परतीच्या मार्गावर


गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले हजारो गणेशभक्त आपल्या गावी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. अशातच दरवाढ झाल्यानं पंप बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाड्यांमध्ये कुटुंबासह लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक असल्यानं नागरिकांचा संताप आणखी वाढला. अनेक ठिकाणी वाहनचालक आणि सीएनजी पंप कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीचा पंप बंद करणे आणि दर बदलाच्या प्रक्रियेत अर्धा तास वाया घालवणे, हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. वाढलेले दर एकीकडं आणि झालेला खोळंबा दुसरीकडे यामुळे दुहेरी त्रास सहन करावा लागतो, असे अनेक प्रवाशांनी सांगितले.



सीएनजी दरवाढीमुळे आर्थिक फटका


CNG दरवाढ आणि  खोळंब्यामुळे रात्री उशिरा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. गॅससाठी ताटकळणाऱ्या वाहनांच्या लांबलचक रांगांमुळे अन्य वाहनांनाही पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. काही वाहनचालकांनी पंपावरच निदर्शने करण्याचा इशारा दिला. अनेक गणेशभक्त आणि वाहनचालक रस्त्यावर अडकून पडल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात अशावेळी पंप सुरू ठेवून योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात येत आहे. सीएनजी दरवाढीमुळे आधीच आर्थिक भार वाढला आहे. त्यात अशा अचानक खोळंब्यामुळे प्रवासी वर्ग त्रस्त झाला. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होत असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली.



कोकणवासीयांच्या त्रासात भर


कोकणात बहुतांश गणेश मूर्तीची स्थापना दीड दिवस, पाच दिवस असल्याने अनेक गणेशभक्त मुंबईला परतत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची खराब स्थिती असल्यानं कोकणवासीयांना मुंबईला परत येतांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यात सीएनजी पंपावरील गर्दी आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : 'देवेंद्र फडणवीस लवकरच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करतील'; भाजपचे नवनाथ बन यांचा दावा

मुंबई :  भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत,

Mumbai News : धक्कादायक! अंधेरीच्या लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरु

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील अंधेरी पूर्व परिसरात एका लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू (Death)

Mulund AC Local : गर्दीच्या वेळी एसी लोकलचा एसी बंद; मुलुंड स्थानकावर १५ मिनिटे खोळंबा, प्रवासी गुदमरून बेशुद्ध

मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे

Ahilyanagar : हॉटेल व्यावसायिक प्रकरणानंतर व्यापारांचा एल्गार! सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur) शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या अकरा

Train Viral Video : चक्क चालत्या ट्रेनमध्ये पूजा अर्चा! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या भारतीय रेल्वेच्या (indian Railway) एका चालत्या डब्यात धार्मिक विधी आणि पूजा केली जात

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख नावे वगळली

ई-केवायसी प्रक्रियेत अपात्र; उत्पन्नाचे निकष न पाळल्याने कारवाई मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी