Mumbai Nasik Highway Accident: देवदर्शनानंतर घरी परतणाऱ्या बाप लेकीवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात


ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी येथील डोहळे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी येथील मुंबई-नाशिक महामार्गनजीक असलेलल्या साईधाम लॉजिस्टिकसमोर घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजेश अधिकारी (वय ३९) व त्यांची मुलगी वेदिका अधिकारी (वय ११) यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही भिवंडी तालुक्यातील सापे गावातील नातेवाईकांकडे देवदर्शनासाठी आले होते व घरी परतत असताना हा अपघात घडला.

या अपघातामुळे शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात गणेशोत्सवाच्या काळात शोककळा पसरली आहे. मृतदेह पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले असून, या घटनेचा अधिक तपास पडघा पोलीस करत आहेत.

 
Comments
Add Comment

डांबरीकरणासाठी शहाड पूल पुन्हा बंद

वाहतूक बंदीमुळे वाहनचालकांना २० दिवस मनस्ताप उल्हासनगर : कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पूल

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील २७ गावांतील रस्ते पथदिव्यांनी प्रकाशमय

कल्याण  : २०२४ मध्ये शासनाने १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार २७ कोटी निधी मंजूर केला. त्यामुळे या

Thane Ring Metro : ठाणेकरांसाठी खुशखबर! ठाण्यात सुरू होणार रिंग मेट्रो; २२ स्थानकं, २९ किमीचा रूट, जाणून घ्या सविस्तर मार्ग!

रिंग मेट्रोमुळे प्रवास होणार वेगवान आणि सुरक्षित ठाणे : ठाणेकरांसाठी (Thane Residents) एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे!

Thane News : ठाणे हादरलं! 'जीवंत सोडणार नाही' धमकी दिली अन् १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला... बंद घरात नेमकं काय घडलं?

ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीला पेटवून दिल्याचा अत्यंत

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला