भंडाऱ्यातलं जेवणं पडलं महागात, संपूर्ण गावाला विषबाधा!

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सध्या सणा सुदीचा काळ असून राज्यभारत अनेक ठिकाणी  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या दरम्यान धार्मिक कार्यक्रमाला येणाऱ्या लोकाना भंडाऱ्याचे आमंत्रण देखील दिले जाते. मात्र अशाच एका भंडाऱ्याच्या कार्यक्रमात जेवण करणं गावकऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे.


भिलाईपाडा गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमातून ग्रामस्थांना काही पदार्थ वितरित करण्यात आले होते. हा पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला होता. एक एक करून संपूर्ण गावातील नागरिकांना हा त्रास जाणवू लागला. यानंतर त्या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली.


सध्या, बाधित ग्रामस्थांना नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित व माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित रुग्णालयात दाखल झाले त्यांनाही यावेळी रुग्णांची विचारपूस केली.

Comments
Add Comment

President Draupadi Murmu: राष्ट्रपती २५ फेब्रुवारी रोजी करणार राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

अकोला :  भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २८

महाराष्ट्राचा सुपुत्र गुजरातच्या मुख्य निवडणूकअधिकारीपदी

अकोला : भारतीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची गुजरात राज्याचे नवीन मुख्य निवडणूक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन

नाशिक :  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने उद्योजक आणि इनोव्हेटर्स तसेच स्टार्ट अप्स यांनी नाशिक शहरातील

लंडन ते हैद्राबाद विमानात तांत्रिक बिघाड; १६९ प्रवाशांचा जीव टांगणीला

नागपूर : ब्रिटिश एअरवेज बोईंग ७८७ हा विमान लंडनहुन हैद्राबादला येत होते. या विमानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Beed: दहावीच्या मुलीचं अपहरण करत...; पीकअप चालकाच्या कृत्याने परिसरात तीव्र संताप

बीड: गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. आता केज तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली

महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे.