सिंहगड भागात भरदिवसा बिबट्यांचे दर्शन

पुणे : पुणे-पानशेत रस्त्यासह सिंहगड, पानशेत भागात वारंवार बिबटे आढळण्याचे प्रकार घडत आहेत. भरदिवसा बिबट्यांचे दर्शन होत असल्याने या परिसरात दहशत पसरली आहे. परिणामी, येथील स्थानिकांसह पर्यटकांनाही धोका निर्माण झाल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे सुरक्षेसाठी वन विभागाने मुख्य पानशेत रस्त्यासह परिसरात रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.याबाबत हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव जोरी यांनी वन विभागाचे लक्ष वेधले आहे.

जोरी म्हणाले की, सिंहगड किल्ल्याच्या डोंगररांगांतून व खडकवासला धरणतीरावरून जाणार्या पानशेत रस्त्यावर मोठी वर्दळ असते. खानापूर ते पानशेत यादरम्यानचा रस्ता जंगलातून जातो. या भागात बिबट्यांचे लपणक्षेत्र आहे. त्यामुळे खाद्य किंवा पाण्यासाठी बिबट्यांसह वन्यप्राणी रस्त्याच्या बाजूला फिरतात. बिबटे, तरस असे प्राणी थेट खासगी कंपन्या, फार्म हाऊस, जनावरांच्या गोठ्यात शिरण्याचे यापूर्वी प्रकार घडले आहेत. त्यामुळे या परिसरात या प्राण्यांची मोठी भीती आहे. पानशेत रस्त्यावरील मालखेड (ता. हवेली) येथील एका खासगी कंपनीत बिबट्याने गेल्या आठवड्यात ठाण मांडले होते. त्या वेळी कंपनीच्या वॉचमनसह कामगारांची मोठी धावाधाव झाली होती. सिंहगड पायथ्याच्या थोपटेवाडी, काळुबाई मंदिर भागातील जंगलात दोन बिबट्यांचा वावर आहे. कुत्री, वासरे अशा जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. दरम्यान, सिंहगड वन विभागाने मालखेड, सिंहगड भागातील कंपन्या, गावोगाव जनजागृती सुरू केली आहे.

वन विभागाची गस्त सुरु

पानशेत, रुळे, धिंडली भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पानशेत वन विभागाच्या वनपरिमंडल अधिकारी स्मिता अर्जुने, वनरक्षक राजेंद्र निंबोरे यांच्या पथकाने गस्त सुरु केली आहे.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये