राज्यभरात आज गौराईला दिला जाणार निरोप

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी आलेल्या गौरींचे आज विसर्जन होत आहे. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते आणि ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे विसर्जन केले जाते. त्यानुसार, आज (२ सप्टेंबर) गौरी विसर्जन होत आहे.


गौरी विसर्जनाच्या दिवशी महिला पारंपरिक वेशभूषा करून गौरींची पूजा करतात. गोड-धोड नैवेद्य आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करून गौरीला जेवण दिले जाते. त्यानंतर गौरीची आरती केली जाते आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत गौरींना निरोप दिला जातो. अनेक ठिकाणी गौरींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने नदी-तलावांमध्ये केले जाते, तर काही ठिकाणी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



पर्यावरणपूरक विसर्जनावर भर


यंदा अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनावर भर देण्यात आला आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी अनेक ठिकाणी महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांनी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. भाविकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये केले.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी