राज्यभरात आज गौराईला दिला जाणार निरोप

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी आलेल्या गौरींचे आज विसर्जन होत आहे. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते आणि ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे विसर्जन केले जाते. त्यानुसार, आज (२ सप्टेंबर) गौरी विसर्जन होत आहे.


गौरी विसर्जनाच्या दिवशी महिला पारंपरिक वेशभूषा करून गौरींची पूजा करतात. गोड-धोड नैवेद्य आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करून गौरीला जेवण दिले जाते. त्यानंतर गौरीची आरती केली जाते आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत गौरींना निरोप दिला जातो. अनेक ठिकाणी गौरींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने नदी-तलावांमध्ये केले जाते, तर काही ठिकाणी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



पर्यावरणपूरक विसर्जनावर भर


यंदा अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनावर भर देण्यात आला आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी अनेक ठिकाणी महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांनी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. भाविकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये केले.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.