या ठिकाणी एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणी करत थेट गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणानंतरही, मराठा आरक्षणाबाबत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने आलेल्या नैराश्यातून नितीन माणिकराव चव्हाण या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सुगाव गावावर शोककळा पसरली आहे.