Ganeshotsav 2025: गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी एमपीसीबी सज्ज

पुणे : गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात दाखल झालेल्या याचिकेनंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने एमपीसीबी, पोलिसांनी उत्सवात मंडळांच्या आवाजाची पातळी मोजावी. तसेच मांडवातील ध्वनीप्रदुषणाबाबत जनजागृती करावी असे आदेश दिले आहेत. गतवर्षी पुण्यासह उपनगरांतील २०० मंडळांच्या आवारात आवाजाची मोजणी आणि जनजागृती केली होती. पोलिसांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १२४ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले होते.


शहराच्या कोणत्या भागात किती आवाजाची पातळी असावी याचे निकष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) निश्चित केलेले आहेत. त्यानुसार यावर्षी गणेशोत्सवातील ध्वनिप्रदुषण रोखण्यासाठी एमपीसीबीने कंबर कसली आहे. मध्यवर्ती शहरासह उपनगरांत निवडलेल्या दोनशे गणेश मंडळांचे अकरा दिवस, तर पंधरा महत्वाच्या वर्दळीच्या चौकांमध्ये चार दिवस एमपीसीबीतर्फे आवाजाची मोजणी होणार आहे.


यावर्षी एपीसीबीने स्वारगेट, शिवाजीनगर, मध्यवर्ती पेठा, एरंडवणे, कोथरूड, सिंहगड रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, कात्रज, खडकी, येरवडा, विश्रांतवाडी यांसह विविध भागांत दोनशे गणेश मंडळे निश्चित केली आहेत. तसेच वर्दळीचे चौकही यामध्ये निवडण्यात आले असून, तेथे मोजणीसाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. हे पथक दररोज सायंकाळनंतर आवाजाच्या पातळीची नोद घेणार आहेत.
ध्वनिप्रदुषण जनजागृतीसाठीएमपीसीबीने कॉलेजच्या तीनशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. हे विद्यार्थी मंडळात ध्वनिप्रदूषाणामुळे मानवी आरोग्य, पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देतील. तसेच काही ठिकाणी ध्वनिमर्यादिचे फलकही लावले आहेत. यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेली आवाजाची पातळी आणि सद्यस्थितीतील आवाजाचा आलेख आहे.


“गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती, प्रत्यक्ष आवाजाची मोजणी आणि उल्लंघन करणाऱ्या मंडळांची यादी तयार करणे अशा तीन पातळ्यांवर एमपीसीबी काम करणार आहे. पहिल्या दिवसापासून पथकांनी नोंदी घेण्यास सुरू केले आहे. मंडळांच्या परिसरातही जनजागृती आणि माहितीपर फलक लावले आहेत.” असे कार्तिकेय लंगोटे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी म्हंटले आहे.

Comments
Add Comment

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

Union Minister Son Arrested : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप; दारू पाजून शोषण केल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांचे पुत्र बंडी भगीरथ (Bandi Bhagirath) यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा