रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील धक्कादायक व्हिडीओ, तरुणाला भोवली अतिघाई


रत्नागिरी : चालत्या गाडीत चढू नये किंवा चालत्या गाडीतून उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासन वारंवार करते. पण अनेकजण या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात. यामुळेच रेल्वेच्या हद्दीत दुर्घटना घडतात. ताजी घटना कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात घडली. चालत्या गाडीतून तरुण चुकीच्या पद्धतीने उतरला. यामुळे तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली जाऊ लागला. पण फलाटावर असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी तसेच एका विक्रेत्याने सतर्कतेने तरुणाचे प्राण वाचवले. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे.





लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी गाडी शनिवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून ४१ मिनिटांनी रत्नागिरीच्या फलाट क्रमांक एक वर आली. ही गाडी फलाटावर येऊन पूर्ण थांबण्याआधीच एका तरुणाने उतरण्याचा प्रयत्न केला. चालत्या गाडीतून तरुण चुकीच्या पद्धतीने उतरला. यामुळे तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली जाऊ लागला. तरुण संकटात असल्याची जाणीव होताच फलाटावर असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी तसेच एका विक्रेत्याने सतर्कतेने तरुणाचे प्राण वाचवले. तिघांनी रेल्वे खाली जात असलेल्या तरुणाला वेगाने खेचले. त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले.


कोकण रेल्वेचे आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी तरुणाला वाचवले. मिळालेल्या माहिती नुसार तरुण गोळप रत्नागिरी येथील निवासी होता. जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तात्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले आणि तिघांचे कौतुक केले.


Comments
Add Comment

IPL मध्ये चाललंय काय ? दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारे ७५ धावांत ऑलआऊट

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Urea : भारत आणि रशिया संयुक्तपणे वर्षाला २० लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती करणार

नवी दिल्ली : भारत आणि रशिया संयुक्तपणे वर्षाला २० लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती करणार आहेत. यासाठी एक प्रकल्प

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Shivsena Latur : लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा वाढतोय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील