जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. रामबनच्या राजगढ भागात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत तीन लोकांचा मृत्यू झाला असून, पाच जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.


गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचमुळे रामबन जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ढगफुटीमुळे अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले असून, काही घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.


जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (NH-44) देखील ठप्प झाला आहे, ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या भागातील शाळा आणि महाविद्यालये ३० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या