Ganeshotsav 2025 : महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं! मराठी अस्मितेसाठी गणेशोत्सवात देखावा- १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण

मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा परेल व्हिलेजमध्ये गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. रविंद्र शंकर चिटणीस, अभिषेक रविंद्र चिटणीस यांनी घरच्या बाप्पासाठी 'माझ्या मराठीची गोडी' या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे.





या संकल्पनेतून त्यांनी एक छोटा संदेशसुद्धा पोहोचवला आहे, भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली असली तरी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी झालेला लढा आणि त्यातील बलिदान आजही ताजे आहेत. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली गेली आणि १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर अखेर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मात्र आजही महाराष्ट्राचे काही प्रांत कर्नाटक आणि गुजरातकडे आहेत, हे वास्तव मराठी जनतेच्या मनाला सतत वेदना देत आहे. याचबरोबर महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषेवर अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागली आहे. परप्रांतीयांचा ओघ वाढल्याने स्वतःच्या मातृभाषेची ओळख जपण्यासाठी मराठी माणसालाच संघर्ष करावा लागत आहे, अशी खंत व्यक्त केली जाते.



“महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं आणि मराठी टिकवायचं, अन्यथा महाराष्ट्र सोडायचं,” अशी ठाम भूमिका स्वाभिमानी मराठी तरुण मांडताना दिसत आहेत. मराठीच्या गतवैभवासाठी हा लढा अखेरपर्यंत लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा लढा आणि मराठी भाषा व संस्कृतीचे रक्षण याचे महत्त्व या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.