हिमाचल प्रदेश : चंबा येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा आणि भरमौर परिसरात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भरमौर परिसर संपूर्णपणे बाहेरच्या जगापासून तुटून गेला आहे. अनेक ठिकाणी रस्ते कोसळले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. दूरसंचार सेवा सुद्धा अनेक भागांत अजूनही सुरू झालेल्या नाहीत. मणिमहेश यात्रेत सहभागी हजारो भाविक अडकले आहेत.


गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांनी आपली वाहने रस्त्यावरच सोडून पायपीट सुरू केली आहे. चंबा जिल्ह्यातील भरमौर भागात प्रसिद्ध मणिमहेश यात्रा सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद असल्याने यात्रेकरूंचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला होता, ज्यामुळे चिंता वाढली होती. भूस्खलन आणि रस्ते बंद असल्याने अनेक यात्रेकरू भरमौरमध्ये अडकले आहेत. चंबा जिल्ह्यात आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पाहता मणिमहेश यात्रेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.


मणिमहेशमधून सुमारे 3 हजार लोक सुखरूप परतले आहेत, पण अजूनही सुमारे 7 हजार भाविक तिथे अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. ही यात्रा दरवर्षी जन्माष्टमीपासून राधाष्टमीपर्यंत आयोजित केली जाते. यंदा जन्माष्टमी 16 ऑगस्टला होती तर राधाष्टमी 31 ऑगस्टला आहे.


दरम्यान, हिमाचल प्रदेशातल्या या मुसळधार पावसामुळे राज्यभरात जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यातील 2राष्ट्रीय महामार्गांसह एकूण 795 रस्ते बंद आहेत. तसेच 5 जिल्ह्यांतील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ब्यांस नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाने चंबा, कांगडा आणि मंडी जिल्ह्यांसाठी 2 दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे.भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे, तसेच चंबा जिल्ह्यात 5 घरे कोसळली आहेत.

Comments
Add Comment

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान