बिहारच्या ३ लाख मतदारांना निवडणूक आयोगाची नोटीस

परदेशी नागरिक असल्याच्या संशयावरून बाजवली नोटीस


पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या (एसआयआर) दरम्यान सुमारे 3 लाख मतदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नागरिकांची नागरिकता "संशयास्पद" असल्याचा संशय आहे.


बिहारमध्ये बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या संशयित मतदारांना बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये, विशेषतः आंतरराष्ट्रीय सीमा लागून असलेल्या भागांतील निर्वाचन नोंदणी अधिकाऱ्यांकडून (ईआरओ) या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या मदतारांच्या दस्तावेजांची पडताळणी करताना काही विसंगती आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.


या संशयित मतदारांची नावे 1 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या मसुदा मतदार यादीत प्रकाशित करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, जर हे मतदार भारतीय नागरिक असल्याचे योग्य कागदपत्र सादर करण्यात अयशस्वी झाले, तर त्यांची नावे 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीतून वगळली जातील.


निवडणूक आयोग या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुद्धा करत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील 3 लाख लोकांची नागरिकता संशयास्पद आहे. अशा लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या मतदारांपैकी बरेच जण बांगलादेश आणि नेपाळ येथील असल्याचा संशय आहे. तर काहीजण म्यानमार आणि अफगाणिस्तान येथील असल्याचीही माहिती आहे. जिल्ह्यांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) यांनी केलेल्या क्षेत्र भेटीदरम्यान ही माहिती समोर आली, आणि त्यानंतर संबंधित ईआरओने नोटिसा जारी केल्या.


दस्तऐवज पडताळणीदरम्यान अनेक विसंगती आढळल्या, आणि त्यानंतर क्षेत्रीय चौकशी करून नोटिसा पाठवण्यात आल्या. पूर्वी चंपारण, पश्चिमी चंपारण, मधुबनी, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, अररिया आणि सुपौल हे जिल्हे अशा प्रकरणांसाठी विशेष लक्षात आले आहेत. ज्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून आवश्यक दस्तावेज सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जर त्यांनी योग्य कागदपत्र सादर केली, तर त्यांची नावे मतदार यादीतून काढली जाणार नाहीत.


पण जर कोणी आवश्यक दस्तावेज सादर करण्यात अपयशी ठरले, तर त्यांची नावे मसुदा मतदार यादीतून वगळली जातील आणि त्यांच्याविरुद्ध कारवाईही होऊ शकते. यानंतर आयोगाचे अधिकारी जिल्हा प्रशासनाला अहवाल देतील की हे मतदार गैर-भारतीय नागरिक असल्याचे आढळून आले आहेत.


Comments
Add Comment

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.

चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर