बिहारच्या ३ लाख मतदारांना निवडणूक आयोगाची नोटीस

परदेशी नागरिक असल्याच्या संशयावरून बाजवली नोटीस


पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या (एसआयआर) दरम्यान सुमारे 3 लाख मतदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नागरिकांची नागरिकता "संशयास्पद" असल्याचा संशय आहे.


बिहारमध्ये बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या संशयित मतदारांना बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये, विशेषतः आंतरराष्ट्रीय सीमा लागून असलेल्या भागांतील निर्वाचन नोंदणी अधिकाऱ्यांकडून (ईआरओ) या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या मदतारांच्या दस्तावेजांची पडताळणी करताना काही विसंगती आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.


या संशयित मतदारांची नावे 1 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या मसुदा मतदार यादीत प्रकाशित करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, जर हे मतदार भारतीय नागरिक असल्याचे योग्य कागदपत्र सादर करण्यात अयशस्वी झाले, तर त्यांची नावे 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीतून वगळली जातील.


निवडणूक आयोग या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुद्धा करत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील 3 लाख लोकांची नागरिकता संशयास्पद आहे. अशा लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या मतदारांपैकी बरेच जण बांगलादेश आणि नेपाळ येथील असल्याचा संशय आहे. तर काहीजण म्यानमार आणि अफगाणिस्तान येथील असल्याचीही माहिती आहे. जिल्ह्यांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) यांनी केलेल्या क्षेत्र भेटीदरम्यान ही माहिती समोर आली, आणि त्यानंतर संबंधित ईआरओने नोटिसा जारी केल्या.


दस्तऐवज पडताळणीदरम्यान अनेक विसंगती आढळल्या, आणि त्यानंतर क्षेत्रीय चौकशी करून नोटिसा पाठवण्यात आल्या. पूर्वी चंपारण, पश्चिमी चंपारण, मधुबनी, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, अररिया आणि सुपौल हे जिल्हे अशा प्रकरणांसाठी विशेष लक्षात आले आहेत. ज्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून आवश्यक दस्तावेज सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जर त्यांनी योग्य कागदपत्र सादर केली, तर त्यांची नावे मतदार यादीतून काढली जाणार नाहीत.


पण जर कोणी आवश्यक दस्तावेज सादर करण्यात अपयशी ठरले, तर त्यांची नावे मसुदा मतदार यादीतून वगळली जातील आणि त्यांच्याविरुद्ध कारवाईही होऊ शकते. यानंतर आयोगाचे अधिकारी जिल्हा प्रशासनाला अहवाल देतील की हे मतदार गैर-भारतीय नागरिक असल्याचे आढळून आले आहेत.


Comments
Add Comment

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात