शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला


संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स येथे घडली. हल्लेखोर संगमनेर तालुक्यातील एका ग्रामीण भागातील आहे. यामुळे संगमनेर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. खताळ यांनी संयमाची भूमिका घेत कार्यकर्त्यांना संयम आणि शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.


संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे गणेशोत्सवानिमित्त संगमनेर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. खताळ कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम पार पडल्यानांतर नागरिकांना भेटत त्यांच्या वाहनाकडे जात असताना ग्रामीण भागातील एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले. ही बातमी वाऱ्यासारखी शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात पसरल्याने शेकडोंच्या संख्येने खताळ समर्थक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. खताळ यांनी जमलेल्या सर्वांनाच शांतता राखण्याचे आवाहन केले. घटनास्थळी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला.


समर्थकांनी आणि नागरिकांनी शांत राहावे, खताळ यांचे आवाहन


सदर घटना ही विकृत बुध्दीच्या लोकांनी केली आहे. ज्याने हल्ला केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करणार आहे. त्यामुळे आता कोणीही चुकीचे काम करायचे नाही. सर्वांनी संयम व शांततेची भूमिका पार पाडायची आहे. गणेश उत्सव असून आपल्याला हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करायचे नाही. सर्वांनी शांत राहावे, असे आवाहन खताळ यांनी समर्थकांना केले.


Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी