शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला


संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स येथे घडली. हल्लेखोर संगमनेर तालुक्यातील एका ग्रामीण भागातील आहे. यामुळे संगमनेर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. खताळ यांनी संयमाची भूमिका घेत कार्यकर्त्यांना संयम आणि शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.


संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे गणेशोत्सवानिमित्त संगमनेर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. खताळ कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम पार पडल्यानांतर नागरिकांना भेटत त्यांच्या वाहनाकडे जात असताना ग्रामीण भागातील एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले. ही बातमी वाऱ्यासारखी शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात पसरल्याने शेकडोंच्या संख्येने खताळ समर्थक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. खताळ यांनी जमलेल्या सर्वांनाच शांतता राखण्याचे आवाहन केले. घटनास्थळी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला.


समर्थकांनी आणि नागरिकांनी शांत राहावे, खताळ यांचे आवाहन


सदर घटना ही विकृत बुध्दीच्या लोकांनी केली आहे. ज्याने हल्ला केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करणार आहे. त्यामुळे आता कोणीही चुकीचे काम करायचे नाही. सर्वांनी संयम व शांततेची भूमिका पार पाडायची आहे. गणेश उत्सव असून आपल्याला हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करायचे नाही. सर्वांनी शांत राहावे, असे आवाहन खताळ यांनी समर्थकांना केले.


Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी