राज ठाकरेच्या घरच्या गणपतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन, शिवतीर्थवर काय झाली चर्चा?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ शिवतीर्थावर पाहायला मिळाली. ज्यामध्ये उबाठा गटातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश होता. मात्र, यादरम्यान सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती!मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी शिवतीर्थावर येत राज ठाकरे यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही कुटुंबासह शिवतीर्थावर जात राज ठाकरेंच्या गणरायाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर या दोघांनी काही मिनिटे एकत्र घालवत फोटो देखील काढले.


उद्धव ठाकरे गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवतीर्थावर राज ठाकरेसोबतची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अलीकडेच एक बैठक झाली होती. त्यानंतर आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही दोघं पुन्हा एकदा भेटली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये इतरही नेते राज ठाकरेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाण्याची शक्यता आहे. आजच्या या भेटींमुळे राजकारणावर फारसा प्रभाव पडणार नसला तरी राज्यातील नेते हे राज्याची संस्कृती जपत असल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment

Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्