राज ठाकरेच्या घरच्या गणपतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन, शिवतीर्थवर काय झाली चर्चा?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ शिवतीर्थावर पाहायला मिळाली. ज्यामध्ये उबाठा गटातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश होता. मात्र, यादरम्यान सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती!मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी शिवतीर्थावर येत राज ठाकरे यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही कुटुंबासह शिवतीर्थावर जात राज ठाकरेंच्या गणरायाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर या दोघांनी काही मिनिटे एकत्र घालवत फोटो देखील काढले.


उद्धव ठाकरे गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवतीर्थावर राज ठाकरेसोबतची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अलीकडेच एक बैठक झाली होती. त्यानंतर आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही दोघं पुन्हा एकदा भेटली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये इतरही नेते राज ठाकरेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाण्याची शक्यता आहे. आजच्या या भेटींमुळे राजकारणावर फारसा प्रभाव पडणार नसला तरी राज्यातील नेते हे राज्याची संस्कृती जपत असल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment

Red Soil Storiesच्या शिरीष गवस यांच्या आजारपणाबद्दलचं सत्य आलेय समोर...पत्नीने सांगितले सर्व काही...

मुंबई: प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवस यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांना

मुंबईच्या कुर्ला परिसरात भीषण आग, अनेक दुकाने आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरातील अनेक दुकानांना भीष आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीच्या

थकीत ४ हजार कोटींची रक्कम द्या ! विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन

मुंबई (प्रतिनिधी): एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोमवार-मंगळवारी या ठिकाणी मेगाब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या कर्जत विभागात तांत्रिक देखभालीची आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी सलग दोन दिवस, म्हणजे

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील

मुंबई महापालिकेत आर्थिक काटकसरीला सुरुवात

अधिकाऱ्यांच्या वाहन सेवांमध्येच पहिली कपात मुंबई : मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतरही