एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वी

  14

मुंबई : राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.


याबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, "एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेच्या दरम्यान होत असतो; परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आल्याने केवळ वेतनामुळे त्यांचे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडू नये! म्हणून राज्य सरकारला एसटीच्या विविध सवलती पोटीची प्रतिपूर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती केली. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होईल!"


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जुलै महिन्याच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी ४७७.२५ कोटी रुपये देण्यास मान्यता देण्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा

आता मेट्रो-३ रविवारीही सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही मेट्रो ३ ची सेवा आता रविवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. मेट्रो ३

गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले राहणार 'जिजामाता उद्यान'

मुंबई: गणेशोत्सवाच्या सुट्टीतही 'जिजामाता उद्यान' बुधवारी पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. मात्र २८ ऑगस्ट या दिवशी

'आपले सरकार' पोर्टलवरील सेवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून द्याव्यात', मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात, या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली