गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी


पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग परिसर, रविवार पेठ, बोहरी आळी परिसरात शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक अडवून ठेवल्याने स्वतः ठाकरे यांच्यासोबत सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले, तर बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, मंडई येथे वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणीतून मार्ग काढून खरेदी पुढे मार्गस्थ व्हावे लागले.


गणेश उत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखावे उभे करण्यासाठी लगबग सुरू आहे. त्यातच शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठा असून रस्त्यांलगत असलेल्या मंडपांमुळे रस्ते अरूंद झाले आहेत. शनिवारच्या सुट्टीनिमित्त सहकुटुंब साहित्य खरेदी करण्यासाठी कुटुंबासमवेत बाहेर पडलेल्या नागरिकांनी मंडई, तुळशीबाग, नारायण पेठ, अप्पा बळवंत चौक, कसबा या ठिकाणी गर्दी झाल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या परिसरात वाहनतळांवर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.


मध्यभागासह उपनगरातील बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. कोथरुड, कर्वेनगर, वारजे, हडपसर, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, कोंढवा, वानवडी, हडपसर, केशवनगर, मुंढवा या भागातील बाजारपेठेत गर्दी झाली होती. त्यातच खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी बेशिस्तपणे गल्लीबोळात वाहने लावल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले.


मंडप उभारण्यासाठी बांबू, लोखंडी कमानी, साचे यांचे साहित्य वाहून नेणारी अवजड वाहने रस्त्यांलगत उभी राहिल्याने तसेच हे साहित्य रस्त्यांच्या कडेला पदपथांवर टाकल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले. जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, डेक्कन, आपटे रस्त्यावरही वाहतूक मंदावल्याचे पाहावयास मिळाले.



पाच महिन्यांनंतर भिडे पूल वाहतुकीसाठी खुला


पुणे शहरातील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा भिडे पूल महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) कामामुळे गेल्या पाच महिन्यांपासून (२० एप्रिल) बंद ठेवण्यात आला होता. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणसाखळीतून सुमारे २० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने भिडे पूलावरून पाणी ओसंडून वाहत होते. पाऊस थांबल्याने पाणी ओसरल्याने आणि गणेशोत्सवामुळे वाहनांची गर्दी होत असल्याने अखेर हा पूल शनिवारी (२३ ऑगस्ट) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य