गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी


पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग परिसर, रविवार पेठ, बोहरी आळी परिसरात शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक अडवून ठेवल्याने स्वतः ठाकरे यांच्यासोबत सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले, तर बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, मंडई येथे वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणीतून मार्ग काढून खरेदी पुढे मार्गस्थ व्हावे लागले.


गणेश उत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखावे उभे करण्यासाठी लगबग सुरू आहे. त्यातच शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठा असून रस्त्यांलगत असलेल्या मंडपांमुळे रस्ते अरूंद झाले आहेत. शनिवारच्या सुट्टीनिमित्त सहकुटुंब साहित्य खरेदी करण्यासाठी कुटुंबासमवेत बाहेर पडलेल्या नागरिकांनी मंडई, तुळशीबाग, नारायण पेठ, अप्पा बळवंत चौक, कसबा या ठिकाणी गर्दी झाल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या परिसरात वाहनतळांवर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.


मध्यभागासह उपनगरातील बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. कोथरुड, कर्वेनगर, वारजे, हडपसर, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, कोंढवा, वानवडी, हडपसर, केशवनगर, मुंढवा या भागातील बाजारपेठेत गर्दी झाली होती. त्यातच खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी बेशिस्तपणे गल्लीबोळात वाहने लावल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले.


मंडप उभारण्यासाठी बांबू, लोखंडी कमानी, साचे यांचे साहित्य वाहून नेणारी अवजड वाहने रस्त्यांलगत उभी राहिल्याने तसेच हे साहित्य रस्त्यांच्या कडेला पदपथांवर टाकल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले. जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, डेक्कन, आपटे रस्त्यावरही वाहतूक मंदावल्याचे पाहावयास मिळाले.



पाच महिन्यांनंतर भिडे पूल वाहतुकीसाठी खुला


पुणे शहरातील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा भिडे पूल महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) कामामुळे गेल्या पाच महिन्यांपासून (२० एप्रिल) बंद ठेवण्यात आला होता. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणसाखळीतून सुमारे २० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने भिडे पूलावरून पाणी ओसंडून वाहत होते. पाऊस थांबल्याने पाणी ओसरल्याने आणि गणेशोत्सवामुळे वाहनांची गर्दी होत असल्याने अखेर हा पूल शनिवारी (२३ ऑगस्ट) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार