हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे


हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने आपल्या ५ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले. आरोपी पतीला पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावताना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी स्वाती हिची हत्या केली. स्वाती ही २१ वर्षांची असून, ती ५ महिन्यांची गर्भवती होती. स्वाती आणि महेंद्र हे मूळचे विक्रमबाद जिल्ह्यातील असून, त्यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते हैदराबादमधील बालाजी हिल्स परिसरात राहत होते.


पोलिसांना मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी महेंद्रला रंगेहाथ पकडले. त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले होते आणि ते मुशी नदीत फेकून देण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहाचे तुकडे जप्त केले असून, महेंद्रला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या क्रूर कृत्यामागे नेमके काय कारण होते, याचा पोलीस शोध घेत आहेत.


Comments
Add Comment

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण