हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे


हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने आपल्या ५ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले. आरोपी पतीला पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावताना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी स्वाती हिची हत्या केली. स्वाती ही २१ वर्षांची असून, ती ५ महिन्यांची गर्भवती होती. स्वाती आणि महेंद्र हे मूळचे विक्रमबाद जिल्ह्यातील असून, त्यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते हैदराबादमधील बालाजी हिल्स परिसरात राहत होते.


पोलिसांना मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी महेंद्रला रंगेहाथ पकडले. त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले होते आणि ते मुशी नदीत फेकून देण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहाचे तुकडे जप्त केले असून, महेंद्रला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या क्रूर कृत्यामागे नेमके काय कारण होते, याचा पोलीस शोध घेत आहेत.


Comments
Add Comment

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर