मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात झालीय. राज्यात २८, २९, ३० आणि ३१ ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तर कोकणात २८ ऑगस्टला अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सोमवारी सकाळपासून मुंबईसह, ठाणे आणि उपनगरातही रविवारपासून पाऊस आहे. पावसामुळे पुणे-बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी झाली आहे.

याचा परिणाम गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. त्याशिवाय मुंबईत अनेक मंडळांच्या गणपती बाप्पांचं रविवारी वाजत गाजत आगमन होत आहे. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असून बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसते आहे.

मुंबईत पावसाचा लोकल ट्रेनवर परिणाम झाला आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. याचा परिणाम लोकल ट्रेनवर झालेला आहे. हार्बर ट्रेन उशिराने धावत असून मध्य रेल्वेवरही वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे.

मुंबईत सकाळपासून पावासाने हजेरी लावली असून पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २८ ऑगस्ट रोजी अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य