मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात


मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी आवाहन केले आहे. आता २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरच आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना धमकीवजा इशारा देताना त्यांच्या आईचा उल्लेख करत जरांगेंनी काही शब्दांचा वापर केला. जरांगेंच्या या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटले आहे.


आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करू शकते. पण आंदोलनाच्या निमित्ताने कोणाच्याही मातेला उद्देशून अपशब्द वापरणे योग्य नाही; अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड या सर्वांनीच जरांगेंच्या आक्षेपार्ह भाषेचा जाहीर निषेध केला. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शक्य तेवढ्या तरतुदी केल्या आहेत. तरीही वेगळ्या मागण्यांसाठी मराठा समाज जरांगेंच्या नेतृत्वात आंदोलन करणार असल्यास त्याला सरकारचा विरोध नाही. पण आंदोलनाच्या नावाखाली कोणाच्याही मातेला उद्देशून अपशब्द वापरणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली.


मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये २९ नव्या जातींचा समावेश केला आहे. पण मराठ्यांच्यावतीने केलेल्या मागण्या मान्य केलेल्या नाही, असा आरोप केला. आता मागण्या मान्य होत असतील तर मुंबईत येणार नाही. पण आरक्षण देत नसाल तर सरकार उलथवून टाकेन, अशी धमकी जरांगेंनी दिली.


Comments
Add Comment

शाहरुख व गौरी खानविरुद्ध मानहानीचा खटला, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात!

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस अधिकारी

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सची पर्वा नाही, म्हणतात, त्यांना त्यासाठी पैसे मिळतात..

अमृता फडणवीस यांची परखड मुलाखत! मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता

नितीन गडकरींवर अंजली दमानियांचे गंभीर आरोप

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर

Borivali : बोरिवलीत रस्ता खचला! पोलीस घटनास्थळी, वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा सल्ला

मुंबई : मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एका प्रमुख जंक्शनवर आज सकाळी मोठी घटना घडली. सुमन नगर पुलाखालील कल्पना

मुंबईच्या ऐतिहासिक बाणगंगा तलावाची अशी केली स्वच्छता

मुंबई : धार्मिक विधींमुळे मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावात साचलेले निर्माल्य

राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये आज स्वच्छता मोहीम

‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता