साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

  42

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी जाताना प्रत्येकजण शिर्डीचा प्रसाद सोबत घेऊन जातात. शिर्डी संस्थानच्यावतीने प्रसाद म्हणून लाडू विक्री केली जाते. भाविक हे लाडू आवडीने खरेदी करतात, साधारण २० रुपयामध्ये २ लाडू असलेले पाकीट भाविकांना प्रसाद स्वरूपात दिला जातो. याद्वारे भाविक हवे तितके लाडू घरी घेऊन जाऊ शकतात. मात्र, आता या लाडूंचे दर महाग करण्यात आले आहेत. साईबाबा संस्थानने नुकतेच प्रसाद लाडूचे दर वाढवत ३० रुपये केले आहेत.


शिर्डीचे लाडू देशभरात प्रसिद्ध असून,  साईबाबां संस्थानकडून भाविकांना देण्यात येणारा हा प्रसाद आता महाग करण्यात आला आहे. साईबाबा संस्थानच्या या निर्णयावर अनेक भाविक नाराज असून. यापूर्वी २० रुपयाला मिळणाऱ्या या प्रसादाला ३० रुपये मोजावे लागणार आहे. संस्थानच्या या निर्णयामुळे भाविकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. “भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


संस्थानकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनानंतर मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. मात्र हा तोटा भाविकांकडूनच वसूल करणे योग्य आहे का? असाही सवाल जनसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या