साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी जाताना प्रत्येकजण शिर्डीचा प्रसाद सोबत घेऊन जातात. शिर्डी संस्थानच्यावतीने प्रसाद म्हणून लाडू विक्री केली जाते. भाविक हे लाडू आवडीने खरेदी करतात, साधारण २० रुपयामध्ये २ लाडू असलेले पाकीट भाविकांना प्रसाद स्वरूपात दिला जातो. याद्वारे भाविक हवे तितके लाडू घरी घेऊन जाऊ शकतात. मात्र, आता या लाडूंचे दर महाग करण्यात आले आहेत. साईबाबा संस्थानने नुकतेच प्रसाद लाडूचे दर वाढवत ३० रुपये केले आहेत.


शिर्डीचे लाडू देशभरात प्रसिद्ध असून,  साईबाबां संस्थानकडून भाविकांना देण्यात येणारा हा प्रसाद आता महाग करण्यात आला आहे. साईबाबा संस्थानच्या या निर्णयावर अनेक भाविक नाराज असून. यापूर्वी २० रुपयाला मिळणाऱ्या या प्रसादाला ३० रुपये मोजावे लागणार आहे. संस्थानच्या या निर्णयामुळे भाविकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. “भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


संस्थानकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनानंतर मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. मात्र हा तोटा भाविकांकडूनच वसूल करणे योग्य आहे का? असाही सवाल जनसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध