रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले म्हणून एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रत्नागिरीच्या उद्यमनगरमध्ये घडली आहे.


रेहान अस्लम कापडी (वय १५) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे, जो कॉन्व्हेन्ट शाळेत १० वी अ मध्ये शिकत होता. युनिट टेस्टमध्ये रेहानला कमी गुण मिळाले होते. यावरून त्याच्या आईने त्याच्या पुढील शिक्षणाची आणि भविष्याची चिंता व्यक्त करत त्याला समजावले.


आईच्या या शब्दांनी रेहानच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्याने स्वतःला घरातल्या खोलीत कोंडून घेतले आणि पंख्याला गळफास लावून आपले जीवन संपवले. रेहानच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


त्याच्या वडिलांचा व्यवसाय सी-मॅन असून त्याला दोन बहिणी आहेत. एका क्षणाच्या नैराश्यातून घेतलेल्या या निर्णयामुळे एका उज्वल भविष्याचा अंत झाला, तसेच संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. ही घटना शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर येत असलेल्या मानसिक दबावाकडे लक्ष वेधते आणि पालकांना तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी