चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

  29

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल कोसळला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून 1965 च्या सुमारास हा ब्रीज बांधण्यात आला होता. हा पूल जीर्ण झाल्याने कोसळल्याचा अंदाज आहे.



हा ब्रिज नवीन बांधण्यासाठी प्रस्ताव एमआयडीसीकडे देण्यात आल्याची माहिती चिपळूण तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आज चिपळूणमध्ये येणार असून पुलाची पाहणी करणार आहेत.


घटना घडल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी रात्री सर्व माहिती घेऊन प्रशासनाला सूचना केली आहे. खडपोली, गाणे आदी गावांकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली असून पर्यायी मार्गावरून अवजड वाहने वाहतूक करू शकत नाहीत. पिंपळी-खडपोली-दसपटी या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा ब्रीज कोसळला तेव्हा दैव बलवत्तर म्हणून या पुलावर कोणीही नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.


मुसळधार पाऊस सुरू होता गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र शनिवारी दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. याचा फटका सगळ्यात जुन्या असलेल्या खडपोली एमआयडीसी व काही गावांकडे जाणाऱ्या मोठ्या पुलाला बसला.


1965 साली हा ब्रिज बांधण्यात आला होता. हा ब्रिज तब्बल 60 वर्षे जुना झाला होता. त्यामुळे हा ब्रिज कमकुवत झाला होता. याया सगळ्या दुर्घटनेची गंभीर दखल चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी घेतली असून त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.


Comments
Add Comment

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक