चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल कोसळला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून 1965 च्या सुमारास हा ब्रीज बांधण्यात आला होता. हा पूल जीर्ण झाल्याने कोसळल्याचा अंदाज आहे.



हा ब्रिज नवीन बांधण्यासाठी प्रस्ताव एमआयडीसीकडे देण्यात आल्याची माहिती चिपळूण तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आज चिपळूणमध्ये येणार असून पुलाची पाहणी करणार आहेत.


घटना घडल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी रात्री सर्व माहिती घेऊन प्रशासनाला सूचना केली आहे. खडपोली, गाणे आदी गावांकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली असून पर्यायी मार्गावरून अवजड वाहने वाहतूक करू शकत नाहीत. पिंपळी-खडपोली-दसपटी या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा ब्रीज कोसळला तेव्हा दैव बलवत्तर म्हणून या पुलावर कोणीही नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.


मुसळधार पाऊस सुरू होता गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र शनिवारी दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. याचा फटका सगळ्यात जुन्या असलेल्या खडपोली एमआयडीसी व काही गावांकडे जाणाऱ्या मोठ्या पुलाला बसला.


1965 साली हा ब्रिज बांधण्यात आला होता. हा ब्रिज तब्बल 60 वर्षे जुना झाला होता. त्यामुळे हा ब्रिज कमकुवत झाला होता. याया सगळ्या दुर्घटनेची गंभीर दखल चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी घेतली असून त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.


Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका