Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! या सोप्या पद्धतीने करा बाप्पाची प्राण प्रतिष्ठा, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या

मुंबई : गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण “गणपती बाप्पा कधी येणार” याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जाणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी ही तिथी २७ ऑगस्ट रोजी येत असून, याच दिवशी घराघरात बाप्पाचे स्वागत होणार आहे. त्यानंतर पुढील दहा दिवस भक्तिभावाने गणरायाची पूजा, आरास, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहतील. अखेरच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला विसर्जन सोहळा होणार आहे. या दिवसांत बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. सजावटीची साधने, पूजाविधीचे साहित्य, तसेच विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची खरेदी सुरू होते. एकदा गणपती बाप्पा घरी आल्यावर पूजा आणि प्राणप्रतिष्ठापना हा सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. मात्र पूजेसाठी पंडित मिळणे कठीण झाल्यामुळे अनेकजण स्वतःच पूजा करतात. अशावेळी योग्य विधी आणि मुहूर्त माहिती असणे महत्त्वाचे ठरते.




गणपती प्राणप्रतिष्ठापना


गणेशोत्सवात प्राणप्रतिष्ठापनेला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी मध्यान्ह काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. कारण धार्मिक मान्यतेनुसार, गणपती बाप्पाचा जन्म मध्यान्ह काळातच झाला होता. त्यामुळे या वेळी केलेली प्राणप्रतिष्ठापना अधिक फलदायी आणि मंगलकारी मानली जाते. गणेश जयंतीचा प्रसंग नसला तरी भक्त मोठ्या श्रद्धेने हा मुहूर्त पाळतात. यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून, भक्तांनी ठरलेल्या वेळी प्राणप्रतिष्ठापना विधी करावा, असे तज्ज्ञ सांगतात. योग्य वेळी केलेल्या या पूजेने घरात समृद्धी, सुख-शांती आणि सकारात्मकता नांदते, असा विश्वास गणेशभक्तांमध्ये आहे.



प्राणप्रतिष्ठापना विधी


गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करताना सर्वप्रथम आवाहन विधी करणे आवश्यक मानले जाते. पूजा सुरू करण्यापूर्वी सुपारीला गणेशाची प्रतिकृती मानून तिचे पूजन केले जाते. त्यानंतर ताम्हणात तीनवेळा पाणी सोडले जाते आणि तीनदा आचमन करून शुद्धी केली जाते. यानंतर गणपतीच्या मूर्तीसमोर आवाहन मुद्रा करताना मंत्रोच्चाराने प्राणप्रतिष्ठा केली जाते. भक्तांनी आवाहन करताना खालील मंत्राचा उच्चार करावा – “ॐ भूर्भुवः स्वः गणेशाम्बिकाभ्यां नमः, सुप्रतिष्ठितो भव, प्रसन्नो भव, वरदा भव।” मंत्र पठण करताना गणेशाला पाच फुले अर्पण करावीत. त्यात विशेषतः जास्वंदाचे फूल असल्यास अधिक शुभ मानले जाते, कारण ते गणपतीला अतिशय प्रिय आहे. तसेच, मंत्रोच्चाराच्या वेळी भगवान गणेशाच्या चरणांना पाणी अर्पण करून त्यांचे पाद्यपूजन केले जाते. आचमनासाठीदेखील गणेशाला पाणी अर्पण करून विधी पूर्ण केला जातो. अशा रीतीने मंत्र, फुले आणि जलार्पणासह केलेली प्राणप्रतिष्ठा भक्तगृहात मंगलमय वातावरण निर्माण करते आणि गणरायाची कृपा लाभते, असा विश्वास आहे.




अभिषेक, अर्पण आणि आरतीने करा बाप्पाचे स्वागत


आचमन समर्पण पूर्ण झाल्यानंतर गणेशपूजेचा पुढील टप्पा म्हणजे अभिषेक विधी होय. सर्वप्रथम सुपारीरुपी गणपती तसेच मूर्तीला शुद्ध पाण्याने स्नान घालून शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर पंचामृत स्नान केले जाते. पंचामृतात दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा समावेश असतो. यानंतर सुगंधी तेल व शुद्ध जलानेही गणपतींचा अभिषेक केला जातो. स्नानानंतर बाप्पाला मोळीच्या स्वरूपात वस्त्र अर्पण केले जाते. पवित्र धागा, सुगंधित पदार्थ, तांदळाचे संपूर्ण दाणे अर्पण करून पूजा पुढे नेली जाते. गणेशाला फुलांचा हार, शमीची पाने आणि दुर्वा अर्पण करणे अत्यंत मंगल मानले जाते. तसेच कपाळावर कुंकवाचे तिलक लावून पूजा अधिक पूर्णत्वास नेली जाते. यानंतर भक्तांनी गणेशाला धूप, दीप दाखवून आरती करावी. शेवटी भगवान गणेशाला आवडीचे नैवेद्य अर्पण केला जातो. या संपूर्ण पूजन विधीमुळे भक्तगृहात मंगलमय वातावरण निर्माण होते आणि बाप्पाच्या कृपेचा अनुभव मिळतो, असा विश्वास आहे.

Comments
Add Comment

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५

Will the ITR filing 2025 date be extended? : ITR फायलिंगसाठी तांत्रिक अडचणी! आता फक्त इतके दिवस शिल्लक, ITR डेडलाईन वाढणार का? अपडेट जाणून घ्या

मुंबई : आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची

मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल पाडणार... आता पुढे काय?

स्थानिक लोकांचा जोरदार विरोध, पुनर्वसनाच्या मागणीवर भर मुंबई: मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना