रत्नागिरी : दोन अल्पवयीन मुलींचे जंगलात मृतदेह सापडले, चिपळूणमध्ये घटनेनं खळबळ

चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृत मुलींची नावे मंगला मनोहर वाघे (१५) व सुप्रिया यशवंत वाघे (१४) अशी आहेत.


स्थानिकांच्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या मागील जंगलात शेळ्या चारायला गेल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास त्या परत आल्या व शेळ्या गोठ्यात बांधल्या. थोड्याच वेळाने त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना गोठ्याजवळ पडलेल्या अवस्थेत पाहिले.


त्या बेशुद्ध होत्या, धाप लागत होती आणि प्रकृती गंभीर होती. तिने तत्काळ आरडाओरड केली, त्यानंतर गावकरी धावत आले. घरच्यांनी त्यांना आत नेईपर्यंत दोघींनीही प्राण सोडले होते. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत पाटील यांनी पथकासह धाव घेतली व तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


दोन्ही बहिणींचे मृतदेह दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण तपासून पाहिले जाणार आहे. पोलीस सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करीत असून पुढील चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी