रत्नागिरी : दोन अल्पवयीन मुलींचे जंगलात मृतदेह सापडले, चिपळूणमध्ये घटनेनं खळबळ

चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृत मुलींची नावे मंगला मनोहर वाघे (१५) व सुप्रिया यशवंत वाघे (१४) अशी आहेत.


स्थानिकांच्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या मागील जंगलात शेळ्या चारायला गेल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास त्या परत आल्या व शेळ्या गोठ्यात बांधल्या. थोड्याच वेळाने त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना गोठ्याजवळ पडलेल्या अवस्थेत पाहिले.


त्या बेशुद्ध होत्या, धाप लागत होती आणि प्रकृती गंभीर होती. तिने तत्काळ आरडाओरड केली, त्यानंतर गावकरी धावत आले. घरच्यांनी त्यांना आत नेईपर्यंत दोघींनीही प्राण सोडले होते. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत पाटील यांनी पथकासह धाव घेतली व तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


दोन्ही बहिणींचे मृतदेह दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण तपासून पाहिले जाणार आहे. पोलीस सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करीत असून पुढील चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात