मोनोरेलच्या ताफ्यात अवघ्या पाच गाड्या, नव्या १० गाड्यांची प्रतीक्षा

  28


मुंबई (प्रतिनिधी) : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकला अपेक्षित प्रवासी संख्या अद्याप मिळालेली नाही. असे असले तरी मोनोरेल मार्गिकेवरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पाच-दहा मिनिटांनी मोनोरेल गाडी सोडणे गरजेचे आहे. मात्र, मोनोरेलच्या ताफ्यात कमी गाड्या असून, दररोज या मार्गिकवरून अवघ्या पाच गाड्या धावतात. स्वदेशी बनावटीच्या १० नवीन मोनोरेल गाड्या सेवेत दाखल होणार आहेत, मात्र या दहा मोनो गाड्या सेवेत दाखल होण्यासाठी प्रवाशांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


यामुळे नव्या मोनोसाठी प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंगळवारच्या घटनेमुळे एका गाडीची मोठी हानी झाली असून ही गाडी सध्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याने गुरुवारी चारच गाड्या धावत होत्या. त्यामुळे दोन गाड्यांमधील वारंवारीता वाढविण्यात आली होती. गाड्या कमी असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. नव्या १० गाड्या लवकरात लवकर सेवेत दाखल करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.


गाड्यांची संख्या कमी असल्याने १५ ते ३० मिनिटांच्या कालावधीने गाडी सोडली जाते. त्यातच सध्या सेवेत दाखल असलेल्या गाड्या जुन्या आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने स्वदेशी बनावटीच्या नवीन १० गाड्या खरेदी करून त्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० मोनोरेल गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट मेधा सर्वो ड्राईव्हज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. ५९० कोटी खर्च करून या १० गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्यानुसार सात नवीन गाड्या तयार होऊन मुंबईत दाखल झाल्या आहेत. या गाड्यांची चाचणी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या गाड्या सेवेत का दाखल केल्या जात नाहीत, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. उर्वरित तीन नवीन गाड्याही लवकरच मुंबईत येणार आहेत. पण या १० नवीन गाड्या सेवेत दाखल होण्यासाठी प्रवाशांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! या सोप्या पद्धतीने करा बाप्पाची प्राण प्रतिष्ठा, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या

मुंबई : गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण

पक्षाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा मुंबई : मला नागपुरात उपमुख्यमंत्रीपदाचा विजयगड बंगला

‘खड्डे असतील, तर टोल नाही’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात कार्यवाहीसाठी अभ्यास सुरू मुंबई : केरळ राज्यातील एका

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन मुंबई :  कॉर्पोरेट व खासगी

मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या

ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच मिळणार! गणेशोत्सवानिमित्त सरकारी नोकरदारांना खुशखबर

मुंबई : सध्या राज्यभरात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. दहा दिवसीय