मोनोरेलच्या ताफ्यात अवघ्या पाच गाड्या, नव्या १० गाड्यांची प्रतीक्षा


मुंबई (प्रतिनिधी) : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकला अपेक्षित प्रवासी संख्या अद्याप मिळालेली नाही. असे असले तरी मोनोरेल मार्गिकेवरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पाच-दहा मिनिटांनी मोनोरेल गाडी सोडणे गरजेचे आहे. मात्र, मोनोरेलच्या ताफ्यात कमी गाड्या असून, दररोज या मार्गिकवरून अवघ्या पाच गाड्या धावतात. स्वदेशी बनावटीच्या १० नवीन मोनोरेल गाड्या सेवेत दाखल होणार आहेत, मात्र या दहा मोनो गाड्या सेवेत दाखल होण्यासाठी प्रवाशांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


यामुळे नव्या मोनोसाठी प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंगळवारच्या घटनेमुळे एका गाडीची मोठी हानी झाली असून ही गाडी सध्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याने गुरुवारी चारच गाड्या धावत होत्या. त्यामुळे दोन गाड्यांमधील वारंवारीता वाढविण्यात आली होती. गाड्या कमी असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. नव्या १० गाड्या लवकरात लवकर सेवेत दाखल करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.


गाड्यांची संख्या कमी असल्याने १५ ते ३० मिनिटांच्या कालावधीने गाडी सोडली जाते. त्यातच सध्या सेवेत दाखल असलेल्या गाड्या जुन्या आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने स्वदेशी बनावटीच्या नवीन १० गाड्या खरेदी करून त्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० मोनोरेल गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट मेधा सर्वो ड्राईव्हज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. ५९० कोटी खर्च करून या १० गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्यानुसार सात नवीन गाड्या तयार होऊन मुंबईत दाखल झाल्या आहेत. या गाड्यांची चाचणी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या गाड्या सेवेत का दाखल केल्या जात नाहीत, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. उर्वरित तीन नवीन गाड्याही लवकरच मुंबईत येणार आहेत. पण या १० नवीन गाड्या सेवेत दाखल होण्यासाठी प्रवाशांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक