मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या एलपीजी टँकरमधून गॅस गळती

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास चरवेली-कापडगावदरम्यान जयगडवरून कर्नाटककडे जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. महामार्गावरून धावणाऱ्या या टँकरची गळती मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चालकाला इशारा दिला.


चालकाने तत्काळ टँकर रस्त्यालगत थांबवला आणि सुमारे अर्ध्या तासानंतर आतील गॅसचा दाब कमी झाल्यावर गळती थांबली. या वेळी परिसरात गॅसचा तीव्र वास पसरला होता, मात्र सुदैवाने तेथे मानवी वस्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली.


मिळालेल्या माहितीनुसार, टँकरच्या टाकीतील एलपीजी गॅसचा दाब उष्णतेमुळे वाढल्याने गॅस ओव्हरफ्लो होऊन वरील पाइपमधून बाहेर येऊ लागला. घटनास्थळी कंपनीचे प्रतिनिधी दाखल झाले आणि त्यांनी उन्हामुळे टँकरचे तापमान वाढल्याने हा ओव्हरफ्लो झाल्याचे स्पष्ट केले.


त्यानंतर टँकरवर थंड पाणी टाकून तापमान कमी करण्यात आले आणि पुढील प्रवासास परवानगी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव, पाली पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक मोहन कांबळे तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंब्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


त्यांनी वाहतूक कोंडी टाळत सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या. सदर टँकरची गॅस वाहतूक क्षमता १२ टन असून त्यामध्ये जवळपास ११.७६ टन गॅस भरलेला होता. प्रवासादरम्यान उष्णतेमुळे तापमान वाढून झालेली ही गळती अत्यंत धोकादायक ठरू शकली असती. गळतीदरम्यान जर टँकरच्या संपर्कात कोणतीही ज्वलनशील वस्तू आली असती, तर भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी