मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या एलपीजी टँकरमधून गॅस गळती

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास चरवेली-कापडगावदरम्यान जयगडवरून कर्नाटककडे जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. महामार्गावरून धावणाऱ्या या टँकरची गळती मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चालकाला इशारा दिला.


चालकाने तत्काळ टँकर रस्त्यालगत थांबवला आणि सुमारे अर्ध्या तासानंतर आतील गॅसचा दाब कमी झाल्यावर गळती थांबली. या वेळी परिसरात गॅसचा तीव्र वास पसरला होता, मात्र सुदैवाने तेथे मानवी वस्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली.


मिळालेल्या माहितीनुसार, टँकरच्या टाकीतील एलपीजी गॅसचा दाब उष्णतेमुळे वाढल्याने गॅस ओव्हरफ्लो होऊन वरील पाइपमधून बाहेर येऊ लागला. घटनास्थळी कंपनीचे प्रतिनिधी दाखल झाले आणि त्यांनी उन्हामुळे टँकरचे तापमान वाढल्याने हा ओव्हरफ्लो झाल्याचे स्पष्ट केले.


त्यानंतर टँकरवर थंड पाणी टाकून तापमान कमी करण्यात आले आणि पुढील प्रवासास परवानगी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव, पाली पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक मोहन कांबळे तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंब्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


त्यांनी वाहतूक कोंडी टाळत सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या. सदर टँकरची गॅस वाहतूक क्षमता १२ टन असून त्यामध्ये जवळपास ११.७६ टन गॅस भरलेला होता. प्रवासादरम्यान उष्णतेमुळे तापमान वाढून झालेली ही गळती अत्यंत धोकादायक ठरू शकली असती. गळतीदरम्यान जर टँकरच्या संपर्कात कोणतीही ज्वलनशील वस्तू आली असती, तर भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात