Monsoon: राज्यासह देशभरात २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने जोरदार झोडपले होते. त्यानंतर काहीसा विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा गणेशोत्सव काळात सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ७ दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, तर २५ आणि २६ ऑगस्ट रोजी कोकणात खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील ५ दिवसांत गुजरात किनाऱ्यावर जोरदार वारे (४०-५० किमी प्रतितास वेगाने) वाहण्याची शक्यता आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरातसह उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालजवळ एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. २४ ऑगस्टपासून पूर्व भारत आणि लगतच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.


सोबतच पुढील ७ दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २६ आणि २७ ऑगस्ट रोजी विदर्भ, २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, २२ ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी झारखंड, बिहार, तसेच २५ आणि २६ ऑगस्ट रोजी ओडिशा आणि २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


२६ आणि २७ ऑगस्ट रोजी कर्नाटकच्या किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत भागात, केरळच्या किनारपट्टीवर आणि २५ आणि २६ ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवसांत तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर तेलंगणात अनेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.



Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :