Monsoon: राज्यासह देशभरात २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने जोरदार झोडपले होते. त्यानंतर काहीसा विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा गणेशोत्सव काळात सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ७ दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, तर २५ आणि २६ ऑगस्ट रोजी कोकणात खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील ५ दिवसांत गुजरात किनाऱ्यावर जोरदार वारे (४०-५० किमी प्रतितास वेगाने) वाहण्याची शक्यता आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरातसह उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालजवळ एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. २४ ऑगस्टपासून पूर्व भारत आणि लगतच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.


सोबतच पुढील ७ दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २६ आणि २७ ऑगस्ट रोजी विदर्भ, २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, २२ ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी झारखंड, बिहार, तसेच २५ आणि २६ ऑगस्ट रोजी ओडिशा आणि २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


२६ आणि २७ ऑगस्ट रोजी कर्नाटकच्या किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत भागात, केरळच्या किनारपट्टीवर आणि २५ आणि २६ ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवसांत तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर तेलंगणात अनेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.



Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.